ऑनलाईन टीम/तरुण भारत :
ऊस उत्पादकानी चालू हंगामात आतापर्यंत साखरेचे विक्रमी उत्पादन केले आहे. जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक आणि दुसरा सर्वात मोठा निर्यातदार भारतातील साखर उत्पादन चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 30 मे पर्यंत 15 टक्क्यांनी वाढून विक्रमी 352.4 दशलक्ष टन झाले आहे.
साखर क्षेत्रातील सहकारी NFCSFL ने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अतिरिक्त उत्पादनामुळे या वर्षात आतापर्यंत साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होते आणि सप्टेंबरपर्यंत चालते.
ऑक्टोबर 2021 ते 30 मे 2022 या कालावधीत देशात एकूण 35.24 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जो आजपर्यंतचा विक्रम आहे.देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात 30 मे पर्यंत 1.368 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 1.063 दशलक्ष टन होते.