विविध दलित संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
खानापूर तालुक्यातील दहा गावांसाठी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. एससीएसटी जनतेसाठी हा निधी मंजूर झाला असताना तो निधी निपाणीकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे खानापूर येथील विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सदर निधी खानापूर तालुक्यातील त्या दहा गावांनाच द्यावा, अशी मागणी केली आहे.
अनुसूचित जाती जमातीसाठी हा निधी समाज कल्याण खात्यातर्फे मंजूर झाला होता. दहा गावांना 50 लाख रुपये विविध कामांसाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र अचानकपणे हा निधी निपाणीकडे वळविण्यात आला आहे. तेव्हा सदर निधी हा मंजूर झाल्याप्रमाणे खानापूर तालुक्यालाच द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सिद्धाप्पा मेत्री, प्रभाकर मादार, राजेश गुडनेट्टी, मऱ्याप्पा मादार, राजू कांबळे, यल्लाप्पा कोलकार, पांडुरंग गोळेण्णावर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.