बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून बंद असलेली अनगोळ शेवटच्या बस थांब्यापर्यंतची बससेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रस्ता कामामुळे बस शेवटच्या थांब्यापर्यंत जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांना पायी चालत इतरत्र असलेल्या बसस्टॉपवर यावे लागत होते. दरम्यान अनगोळ शेवटच्या बसस्टॉपपर्यंत बस सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. या मागणीची परिवहनकडून दखल घेण्यात आली आहे. अनगोळ परिसरात अधिक नागरी वसती आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्याही जास्त आहे. दरम्यान या मार्गावर अधिक बसफेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्ता कामामुळे बस शेवटच्या स्टॉपपर्यंत पोहोचत नव्हती. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत होती. याची दखल घेत परिवहनने अखेर अनगोळ शेवटच्या स्टॉपपर्यंत बस सुरू केली आहे.
Previous Articleकाजू उत्पादकांना दराची केवळ अपेक्षाच
Next Article इअर टॅगिंगसाठी प्रशासन कधी जागे होणार?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.