शेतकरी-कामगारांवर आजपर्यंत अन्यायच
बेळगाव : शेतकरी व कामगारांवर आजपर्यंत अन्यायच झाला आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे करून सर्वांनाच वेठीस धरले आहे. त्यामुळे कामगार अडचणीत आले आहेत. याबद्दल सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होवू लागली आहे. सरकारने यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कामगार दिनानिमित्त रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्समधील भगतसिंग सभागृहामध्ये बैठक घेतली. त्यामध्ये अनेक मान्यवरांनी सरकारच्या विरोधातील धोरणाबाबत माहिती देवून त्याचा निषेध केला. अंगणवाडी शिक्षक, मदतनीस यांच्याकडून कामे करवून घेतली जातात. मात्र योग्य वेतन दिले जात नाही. शिक्षिकेना किमान 18 हजार व मदतनीसाना 12 हजार वेतन द्यावे, अशी मागणीही केली. केएसआरटीसी, एलआयसी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. महिला कुस्तीपटूंचे शोषण करणाऱ्या ब्रिजभूषण सिंग यांच्यावर केंद्र कारवाई करत नाही. हे दुर्दैव आहे, बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नागेश सातेरी होते. यावेळी जी. बी. कुलकर्णी, सी. एस. बिदनाळ, यल्लुबाई शिग्गीहळ्ळी, शिवलीला मिसाळे, सिद्धगौडा मोदगी यांनीही आपले विचार व्यक्त केले.