महापालिका, कॅन्टोन्मेंट, एलऍण्डटी-स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय
बेळगाव / प्रतिनिधी
शहराच्या मध्यवर्ती भागात कॅन्टोन्मेंटची वसाहत आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. पण विकासकामे राबविताना संरक्षण खात्याच्या अटी आणि नियमावलीची अडचण निर्माण होत असल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच कॅन्टोन्मेंटच्या पाणी समस्येबाबत चर्चा करण्यासाठी बुधवार दि. 9 रोजी जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
शहरवासियांना कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांचा अवलंब करावा लागतो. शहराच्या चारही बाजूंनी संरक्षण खात्याची हद्द असल्याने विकासकामे राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोणतीही विकासकामे राबविण्यासाठी संरक्षण खात्याकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच रस्त्यांचे रुंदीकरण असो किंवा दुरुस्तीचे काम करण्याकरिता कॅन्टोन्मेंट व संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. पण ही परवानगी लवकर मिळत नसल्याने विकासकामे रखडत आहेत. तसेच कॅन्टोन्मेंट परिसरात 20 हजारहून अधिक लोकसंख्या असून नागरी सुविधा पुरविण्यासाठी कॅन्टोन्मेंटला महापालिका आणि जिल्हा प्रशासनावर अवलंबून रहावे लागते. तरीदेखील विकासकामे करताना कॅन्टोन्मेंटकडून आवश्यक सहकार्य मिळत नाही.
पाणीपुरवठय़ाचा प्रश्न ऐरणीवर
कॅन्टोन्मेंटने जलस्त्राsत निर्माण करण्यासह कोणतीच पाणीपुरवठा योजना राबविली नाही. त्यामुळे महापालिकेच्या जलस्त्राsताच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंटला पाणीपुरवठा केला जातो. तरीदेखील 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्याकरिता कॅन्टोन्मेंट परिसरातून जलवाहिन्या घालण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डने पाणी बिलाची रक्कम थकविली असल्याने 15 दिवसांपासून कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद होता. याबाबत नागरिकांनी आंदोलन छेडून रास्तारोको केला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन कॅन्टोन्मेंटच्या समस्या सोडविण्याची मागणी केली होती.
याची दखल घेत महापालिका, कॅन्टोन्मेंट, एलऍण्डटी आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घेतला आहे. बुधवार दि. 9 रोजी कॅन्टोन्मेंट कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन विकासकामांसह कॅन्टोन्मेंटच्या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने चर्चा केली जाणार आहे. हेस्कॉमचे बिल, थकलेले पाणीबिल आणि रखडलेली विकासकामे तसेच अन्य समस्यांबाबत चर्चा करून तोडगा काढला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.