सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर ः गेल्या 5 महिन्यांतील उच्चांक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकार आणि केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या सर्व प्रयत्नांनंतरही महागाईचा दर वाढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. भारतातील किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये 7.41 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये हे प्रमाण 7 टक्के होते. तसेच एक वर्षापूर्वी म्हणजेच सप्टेंबर 2021 मध्ये ते 4.35 टक्के होते. सप्टेंबर 2022 मध्ये अन्नधान्य महागाई 8.60 टक्के झाली असून दिवाळीसारख्या ऐन सणासुदीमध्ये हा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे देशवासियांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी बुधवारी प्रसिद्ध झाली. खाद्यपदार्थ विशेषतः भाजीपाला आणि डाळींच्या किमती वाढल्याने महागाई वाढली आहे. ऑगस्टमध्ये 7.62 टक्क्यांवर असलेली अन्नधान्य महागाई सप्टेंबरमध्ये जवळपास एक टक्क्यांनी वाढून 8.60 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर भाज्यांची महागाई ऑगस्टमधील 13.23 टक्क्मयांवरून 18.05 टक्क्मयांवर आली आहे. परिणामी एकंदर किरकोळ महागाई दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हा दर सलग नवव्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. सीपीआय दराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 6 टक्क्मयांच्या मर्यादेला ओलांडण्याची ही सलग नववी वेळ आहे.
मसाले, फळे, दुग्धजन्य उत्पादनांचाही भडका
सप्टेंबरमध्ये अन्नधान्य निर्देशांक 8.60 टक्क्मयांवर पोहोचला असून भाज्यांच्या किमतीत 18.05 टक्क्मयांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच मसाल्यांमध्ये 16.88 टक्के, तृणधान्य उत्पादनांमध्ये 11.53 टक्के आणि दूध उत्पादनांमध्ये 7.13 टक्के वाढ दिसून आली. अंडय़ाचे भाव -1.79 टक्क्मयांनी घसरले असले तरी फळे 5.68 टक्क्मयांनी वाढल्याचा परिणामही किरकोळ महागाई दरावर झाल्याचे दिसून येते. तसेच इंधन आणि ऊर्जा आत्पादने 10.39 टक्के, कपडे आणि पादत्राणे 10.17 टक्के आणि गृहनिर्माण विभागातील वस्तू 4.57 टक्क्मयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. सुमारे 299 वस्तूंच्या किमतीच्या आधारावर किरकोळ महागाईचा दर ठरवला जातो.
आरबीआयची नजर, तरीही…
आरबीआयचे द्वैमासिक चलनविषयक धोरण निश्चित करताना ‘सीपीआय’च्या डेटाचा प्रामुख्याने विचार केला जातो. अलीकडेच 30 सप्टेंबर रोजी चलनविषयक धोरण समितीने (एमपीसी) रेपो दर 50 बेसिस पॉईंट्सने वाढवून 5.90 टक्के केला. या आर्थिक वर्षात आतापर्यंत, आरबीआयने वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी मुख्य व्याजदरात 190 बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे. तथापि, रेपोदरातील वाढीनंतरही किरकोळ महागाई उच्चतम पातळीच्या वर राहिली आहे.