कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आझादीचा महोत्सव
उदगाव /वार्ताहर
आझादीच्या अमृतमहोत्सवी निमित्त आज 14 ऑगस्ट रोजी हातात तिरंगा ध्वज घेऊन कृष्णामाई जलतरण मंडळाच्या सदस्यांनी हरिपूर ते उदगाव कृष्णाघाट हे जवळपास 9 किलोमीटर चे अंतर 1 तास 10 मिनिटांमध्ये महापुरातून पोहत पूर्ण करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या 22 जणांचा समावेश होता.
यामध्ये राजू कलगुटगी, प्रा.सुनिल बनहट्टी, जयपाल मगदूम, गणेश पाचंगे, नितीन पाटील,तानाजी जाधव,महेश महाडिक, ऋषभ पाटील, विक्रम घाटगे, संतोष चुडाप्पा, कोळेकर अण्णा, बाळासो चौगुले तसेच मंडळाच्या इतर दस्यांचा समावेश होता.
तसेच मंडळातर्फे अनेक विधायक कामे हाती घेतलेली आहेत. कृष्णाघाटा वरील स्वच्छता, ब्रिटीश कालीन पुलावरील दगडी बांधकामातील अनावश्यक झाडे तोडणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे. तसेच असंख्य मुलामुलींना मोफत पोहण्यास शिकवणे तसेच हरिपूर ते कृष्णाघाट उदगाव, कृष्णाघट उदगाव ते मिरज असा जवळपास 20 किलोमीटर अंतराचा साहसी जलप्रवासाच्या स्पर्धा आयोजित करणे. इत्यादी उपक्रम राबवून साहसी शालेय मुला मुलींना प्रोत्साहनपर बक्षिसे देवून गौरविणे, अशी अनेक कामे केली जात आहेत. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा घालून 700 ते 800 लोकांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करणे तसेच मे महिन्यामध्ये अंगणवाडी पासून ते कॉलेजच्या विध्यार्थ्यांसाठी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित केली जातात.