केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आगामी दोन महिन्यात सर्वसमावेशक राष्ट्रीय पर्यटन धोरण आणणार आहे, असे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितले आहे. सांस्कृतिक पर्यटन आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री रेड्डि म्हणाले की प्रस्तावित धोरणावरील सूचनांसाठी प्रवास क्षेत्रातील संस्था, राज्य सरकारे, वित्तीय संस्था आणि अगदी परदेशी टूर ऑपरेटरशी संबंधित सर्व भागधारकांशी चर्चा सुरु असून यामधून योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
रेड्डी म्हणाले की, आम्ही चर्चा करून त्यांची मते घेत आहोत. आम्ही दोन महिन्यांत अर्थसंकल्पीय अधिवेशनासमोर (संसदेच्या) राष्ट्रीय पर्यटन धोरण सादर करणार आहोत.’
नवीन धोरणात काय असेल
नवीन धोरणात ई-टुरिस्ट व्हिसासाठी मोबाइल ऍप, प्रमुख परदेशी बाजारपेठांशी थेट हवाई संपर्क, पर्यटन स्थळांचे श्रेणींमध्ये वर्गीकरण, विशेष पर्यटन क्षेत्रांची निर्मिती आणि पाच मोहिमांचा समावेश आहे.