जिल्ह्यात पडणाऱ्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण केले असून 15 जुलैला एनडीआरएफचे पथक कोल्हापूरात दाखल होणार आहेत.
साधारण या महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही पावसाळ्य़ांचा अनुभवानुसार प्रशासनाने आपत्तकालीन व्यवस्था उभरणीला जोर दिला आहे. त्यासाठी त्यांनी एनडीआरएफला आमंत्रित केले आहे.
त्यामुळे येत्या 15 जुलैला ही पथके कोल्हापूरात दाखल होणार आहेत. प्रत्येक पूरग्रस्त जिल्ह्यात एक पथक दाखल होणार असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी एकूण दोन पथके तैनात असणार आहेत. पूरस्थिती उद्भवल्यास आणखी एक तुकडी मागवण्य़ात येणार आहे.