वाहतुकीसाठी धोका, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मठ गल्ली कॉर्नरवर गटारीवरील फरशीची दुर्दशा झाल्याने पादचारी आणि वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून ही समस्या असली तरी प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हे गटार धोकादायक बनले आहे.
कॉर्नरवरच सीडी वर्कजवळ गटार उघडय़ावर असल्याने रात्रीच्या अंधारात अपघाताची शक्मयता आहे. शिवाय वाहनांची कोंडी झाल्यास वाहनधारकांनादेखील ये-जा करणे कठीण होत आहे. कॉर्नरवरील गटारीवर फरशी नसल्याने लहान बालके आणि वयोवृद्धांनादेखील ये-जा करणे मुश्कील बनले आहे. तातडीने गटारीवर फरशी बसवून पादचाऱयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.