प्रतिनिधी/ मडगाव
राज्यात वाळू उपशाला बंदी असताना काही ठिकाणी ती सऱहास सुरु असल्याचे दोन दिवसांपूर्वी कुडचडे येथे रेती कामगाराची हत्येतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सासष्टी तालुक्मयातील वाळू उपसा समस्या पुन्हा ऐरणीवर आल्याचे चित्र आहे.
सासष्टी तालुक्मयातील वाळू उपशाची प्रकरणे आता वेगाने वाढू लागली आहेत. तसेच सासष्टी तालुक्मयातील नागरिकांना समुद्रकिनाऱयालगतच्या भागात पुन्हा एकदा वाळू उपसासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार समुद्राच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे ही सेरर्नाभाटी समुद्रकिनाऱयावर तसेच तालुक्मयातील किनारपट्टीवरील इतर ठिकाणी वाळू वाहून जात आहे. ज्याच्यामूळे ठिक-ठिकाणी खोल खड्डे दिसू लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सेरर्नाभाटी समुद्रकिनाऱयावर पावसाळय़ासाठी हॉटेल आणि शॅक बंद करण्यात आलेले आहेत. याच शॅकजवळ आता दोन ठिकाणी धूप झाल्यामुळे वाळूचे खोल ’खड्डे’ तयार झाले आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यामूळे यापूढे हॉटेल आणि शॅकला पुन्हा सुरु करण्यासाठी काय करावे हा प्रश्न असणार आहे. पडत असलेले खडे हे पाण्याची वाढती पातळी, विशेषतः भरती-ओहोटीच्या वेळी, वाळूची धूप होत आहे. याच स्थितीत या समस्या निर्माण होत आहेत. असे परिसरातील स्थानिकांचे म्हणणे आहे.
कुडचडे, पंचवाडी, कुडतरी, जुना बोरी पुल या भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा केली जात आहे. रेती उपसावर बंदी घातल्याने चोरटय़ा मार्गाने रेती उपसा केला जात असल्याने रेतीचा भाव देखील प्रचंड वाढला आहे. त्यामुळे या व्यवसायात असलेले बरेच जण गब्बर झालेले आहेत. हा बेकायदेशीर व्यवसाय राजकीय आशीवार्दाने होत असल्याची चर्चा सर्वत्र आहे.