गेली दोन दशके जागतिक तापमानवाढ हा विषय जगात सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱया विषयांपैकी एक बनून राहिला आहे. साधारणतः 250 वर्षांपूर्वी जगात यंत्रयुगाचे आगमन झाल्यानंतर मानवाने विकास आणि सुखसोयींसाठी निसर्गाचा विविध माध्यमांतून जो ऱहास केला, त्याची फलश्रुती ही जागतिक तापमानवाढ आहे. आधुनिक वैज्ञानिक प्रगतीच्या जोरावर माणसाला जेव्हा जागतिक तापमानवाढीची जाणीव होऊ लागली, तेव्हा सर्वत्र जाग आली आणि मग जागतिक तापमानवाढ विषयक परिषदा, समित्या, नीतीनियम, प्रबोधन, संस्था निर्मिती, संशोधन विभाग या प्रक्रियांना गती आली. काही दिवसांपूर्वी जागतिक तापमानवाढीसंदर्भात एक निरीक्षण पुढे आले आहे. ते ध्यानात घेता सततच्या तापमानवाढीस आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर अद्याप बऱयाच प्रयत्नांची गरज आहे, हे स्पष्ट होते. जागतिक तापमानवाढीची तीव्रता तपासण्यासाठी सागराचे तापमान तपासणे हे एक अलीकडील रुढ परिमाण आहे. अधिकृतपणे 1958 सालापासून अशी तपासणी सुरू झाली. या तपासणीचा मागोवा घेताना हे दिसून आले आहे, की 1958 पासून सागरी तापमान हे एका विशिष्ट मर्यादेत सातत्याने वाढत गेले. 1990 सालानंतर तापमानवाढीची तीव्रता झपाटय़ाने वाढत गेली. ती इतकी की गतवर्ष म्हणजे 2022 साल हे विक्रमी सागरी तापमानवाढ नोंदविणारे वर्ष ठरले आहे.
वैज्ञानिक पद्धतीनुसार तुम्हाला जर जागतिक तापमानवाढ मोजायचे असेल तर जमिनीच्या पृष्टभागावरील वाढलेले तापमान जाते कुठे आणि प्रकटते कुठे, हे तपासावे लागते. 90 टक्के तापमानवाढ ही सागराशी एकरूप होते व तेथेच प्रकटते. आपल्या ग्रहाचा एकूण समतोल कितपत ढासळला आहे, हे सागर तपासणीवरून स्पष्टपणे कळते, हे सत्य ध्यानात घेता उष्ण होणारे सागरी तापमान पराकोटीचे आणि अनाकलनीय हवामान बदल घडवण्यास कारणीभूत ठरते. ऋतुचक्र विस्कटून टाकण्याबरोबरच तुफान, चक्रीवादळे, महापूर, हवेतील दमटपणा वाढणे, अधिक पाऊस, महापूर ही संकटे निर्माण होतात. उष्णतेमुळे समुद्राची पातळी वाढून किनाऱयाजवळ असलेली शहरे, गावे, वस्त्या, महानगरे आकस्मिकपणे पाण्याखाली येऊ शकतात. गतवषी युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेचा पश्चिम किनारा, आफ्रिकन आणि आशियाई देश यांना हवामान बदलाचा जबर तडाखा या ना त्या स्वरुपात जाणवला आहे. तापमानवाढीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वपूर्ण लक्षण म्हणजे ‘सागराचे स्तरीकरण’. जेथे खोलीनुसार सागरी पाण्याचे स्तर वेगळे व बलिष्ट होत जातात. यामुळे सागराच्या खोलीतील थंड, पोषण समृद्ध स्तर पृष्टभागावरील जड स्तरांशी मिसळून एकजीव होणे कठीण बनते. संशोधकांच्या मते ही मिसळून एकजीव होण्याची प्रक्रिया कमकुवत झाल्याने पृष्टभागांवरील स्तराची कर्बद्विल वायु शोधून घेण्याची क्षमता घटते.
स्वाभाविकपणे वातावरणातील कर्बद्विल वायूचे प्रमाण अधिक होऊन त्याचा थेट परिणाम तापमानवाढीवर होतो. 2022 सालानंतरच्या काळात योग्य खबरदारीच्या अभावी अशा प्रकारच्या स्तरीकरणाची प्रवृत्ती वाढत जाईल आणि त्यातून जागतिक तापमानवाढीतही वृद्धी होईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात जाणवणाऱया उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यांचे अलीकडील विक्रमी प्रमाण हे वरील घडामोडींचे परिणाम असून मानवता जोवर शून्य हरितवायू उत्सर्जनाचे लक्ष्य गाठत नाही तोवर सागराचे स्तरीकरण, त्याच्या पृ÷भागावरील उष्णतेचे वाढते प्रमाण आणि जागतिक तापमानवाढ ही साखळी खंडित होणार नाही, असा निष्कर्ष संशोधनातून पुढे आलेला आहे.
या पार्श्वभूमीवर जागतिक वस्तुस्थितीवर नजर टाकता असे दिसून येते, की पृथ्वीच्या तरल, निळय़ा वातावरणात 1850 सालापासून सर्वाधिक हरित वायू (जो जागतिक तापमानवाढीचे मूळ कारण बनला आहे.) तो अमेरिकेकडून भरला गेला. 2021 सालापर्यंत अमेरिकेने एकूण 510 अब्ज टन हरितगृह वायू उत्सर्जित केला आहे. या संदर्भातील जागतिक ऐतिहासिक बेरजेच्या 20 टक्के इतक्मया मोठय़ा प्रमाणात तो या एकाच देशातून उत्सर्जित झाला आहे. चीनकडून 11 टक्के, रशिया 7 टक्के, ब्राझील 5 टक्के, इंडोनेशिया 4 टक्के असे इतर काही अतिउत्सर्जन क्रमवारीत येणाऱया देशातील प्रमाण आहे. यातील ब्राझील व इंडोनेशिया वगळता इतर देशातील हरितगृह वायू उत्सर्जन हा प्रामुख्याने औद्योगिकीकरण, नागरीकरण, वाहने व ऊर्जास्रोत, प्लास्टीक व इतर हानीकारक घटकांचा वापर या साऱयांचा परिपाक आहे. तर ब्राझील व इंडोनेशियातील उत्सर्जन हे अधिक करून जंगलनाश, कृषीकरण या बाबतीतील जमिनीवर झालेल्या विध्वंसाचा परिणाम आहे.
आकडेवारीनुसार सध्या चीन हा हरितगृह वायू उत्सर्जित करणाऱया देशांच्या यादीत क्रमांक एकवर आहे. आपल्या भारताचे देखील या संदर्भातील प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. चीन असो वा भारत हे दोन लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक एक व दोनवर आहेत. त्यानुसार जर तुलना केली तरी या दोन्ही देशातील एका व्यक्तीच्या प्रमाणापेक्षा अमेरिकेतील एका व्यक्तीमुळे होणारे उत्सर्जन अधिक आहे. लोकसंख्या प्रमाणातील तफावतीमुळे ते झाकले जाते इतकेच. ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या माहितीनुसार चीन आणि युरोपियन युनियनमधील उत्सर्जन 2022 साली काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसले तर अमेरिका, भारत आणि इतर काही देशात ते तुलनेत वाढलेले निदर्शनास आले. सध्या आपल्या दिवसेंदिवस गरम होत चाललेल्या ग्रहावर एकूण 8 अब्ज माणसे राहतात. त्यांना वीज असलेले घर, गाडी, स्मार्ट फोन, टॅब्लेट, टेलिव्हिजन, हवा उष्ण ठेवण्याची व थंड ठेवण्याची यंत्रणा यांची आवश्यकता भासते.
याचाच अर्थ खाणकाम, खोदकाम, इंधन जाळणे याद्वारे उत्सर्जन, प्रदूषण आणि तापमानवाढीत भर. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरील एक व्यक्तीस केवळ 90 वॅट्स इतकी ऊर्जा पुरेशी होती. आज प्रत्येकजण स्वतःसाठी 11 हजार वॅट्स इतकी ऊर्जा या ना त्या माध्यमातून दररोज वापरत आहे. दहा हजार वर्षात मानवाच्या बाबतीत उर्जेचा वापर 104 पटीने वाढला तर त्याचा ताण निसर्गावर येणार आणि जागतिक तापमानवाढ यासारख्या अनिष्टास कारणीभूत होणार, हे अटळ होते आणि त्याच्या परिणामास सामोरे जात आहोत. एक जीवशास्त्र शिकविणारे प्राध्यापक आणि संशोधक मॅनप्रेड लॉबिश्चर यांच्या मते मानव जातीने आता आपला जीवशास्त्राrय भूतकाळ बारकाईने अभ्यासला पाहिजे. ज्यातून भविष्यकाळ कसा जगावा, याबाबत काही माहिती मिळेल. आज आपण केवळ जीवशास्त्राrय प्रजाती नसून समाज-तंत्रवैज्ञानिक प्रजातीत आपले रूपांतरण झाले आहे.
आपल्या दैनंदिन ऊर्जा वापराचा खूपच कमी भाग जीवशास्त्राrयदृष्टय़ा आरोग्यदायी जगण्यासाठी गरजेचा आहे. बाकी सारे आपण स्वतः ओढवून घेतलेले ओझे आहे. जर साऱयांनी हे जाणून प्रामाणिक प्रयत्न केले तर जागतिक तापमानवाढ आणि त्याचे परिणाम अजूनही टाळता येतील.
– अनिल आजगावकर