वीज वितरण कंपन्यांचा केईआरसीकडे प्रस्ताव सादर
बेंगळूर : आगामी विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी (एस्कॉम) कर्नाटक वीज नियामक आयोगाकडे वीज दरांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पूर्वीच वीज दरात वाढ होणार की निवडणुकीनंतर वीजदर वाढीबाबत निर्णय घेतले जातील, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. परिणामी, राज्यातील जनतेला लवकरच वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी प्रति युनिट दीड रुपयांपासून ते 2 ऊपयांपर्यंत दरवाढीची मागणी केली आहे. वीज वितरण कंपन्यांच्या दरवाढीबाबत सार्वजनिक हरकती नोंदविण्यासाठी केईआरसीने 13 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत सार्वजनिक अदालतीचे आयोजन केले आहे. दरवषी वीज दरवाढीसाठी एस्कॉमने केईआरसीकडे प्रस्ताव सादर करणे सामान्य आहे. त्यानुसार यावेळीही दीड रुपयांपासून 2 ऊपयांपर्यंत दरवाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. सार्वजनिक अदालतीनंतर केईआरसी वीजदर वाढीबाबत निर्णय जाहीर करणार आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी वीज दरात फेरबदल होणार की निवडणुकीनंतर वीज दरात वाढ होणार, याची सध्या उत्सुकता आहे.
गेल्यावर्षी दोनवेळा वीज दरवाढ
गेल्यावर्षी दोनवेळा वीजदर वाढ करण्यात आली आहे. गेल्या एप्रिलमध्ये केईआरसीने दरात प्रति युनिट 35 पैशांनी वाढ करण्याचा आदेश जारी केला होता. तसेच सप्टेंबरमध्ये वीज दरात 24 पैशांवरून 43 पैसे प्रति युनिट इतकी वाढ करण्यात आली होती.