700 वर्षांपासून सुरू आहे विवाहाची अनोखी प्रथा
हुंडा ही कुप्रथा असली तरीही याचे पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. उत्तरप्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमध्ये हुंडय़ाचे प्रचलन अद्याप मोठय़ा प्रमाणावर आहे. हुंडय़ाची रक्कम नवऱयामुलाच्या प्रोफाइलनुसार ठरत असते. परंतु दशकांपूर्वी सुरू झालेली एक परंपरा याहून खूपच वेगळी होती.
बिहारच्या मधुबनीमध्ये 700 वर्षांपासून नवऱयामुलाचा बाजार भरत आहे. येथे प्रत्येक जाती अन् धर्माचे विवाहइच्छुक युवक येतात आणि मुलीकडचे लोक स्वतः यापैकी एकाची निवड करतात. जो जितकी अधिक बोली लावेल, संबंधित युवक त्यांचा होता.
सौराठ सभा
बिहारच्या मधुबनीमध्ये विवाहासाठी भरणाऱया नवऱयामुलाच्या बाजाराला सौराठ सभा म्हटले जाते. या सौराठ सभेची सुरुवात 700 वर्षांपूर्वी झाली होती आणि अद्याप तिचे पालन सुरू आहे. या सभेचा उद्दे सर्व जात अन् धर्मामधील विवाहइच्छुक युवक एकत्र यावेत असा आहे. तर विवाह करणाऱया मुलीचे नातेवाईक मुलीसह या सभेत भाग घेतात. मग बाजारातील उत्तम मुलाची निवड स्वतःच्या मुलीसाठी करतात. उत्तम मुलाच्या निवड प्रक्रियेत त्याचे शिक्षण, घर-परिवार, वर्तन आणि जन्मपत्रिका पाहिली जाते. सर्व गोष्टींची पडताळणी केल्यावर मुलगा पसंत पडला तर मुलगी होकार देते. पुढील बोलणीची जबाबदारी कुटुंबातील पुरुष सदस्यांचीच असते.
तर अनुमती नाही..
या सौराठ सभेची सुरुवात कर्नाट वंशाचे राजा हरिसिंह यांनी केली होती असे बोलले जाते. विविध गोत्रांमध्ये विवाह करविणे आणि हुंडारहित विवाह करणे हा यामागे उद्देश होता. या सभेत 7 पिढय़ांपासून रक्तसंबंध आणि रक्तसमूह आढळल्यास विवाहाची अनुमती नाही.
क्षमतेनुसार होते निवड
एकाच ठिकाणी सर्व विवाहइच्छुक युवक येत असल्याने युवतीच्या कुटुंबीयांना मुलाची निवड करणे सोपे जाते. परंपरा 700 वर्षांपासून चालत आली असली तरीही कालौघात यात काही वाईट प्रवृत्ती शिरल्या आहेत. पूर्वीप्रमाणे ही सभा आता हुंडारहित राहिलेली नाही.