वाहनधारक हैराण
प्रतिनिधी/ बेळगाव
अरुंद रस्ते आणि वाढती वाहने यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. बाजारपेठेसह इतर ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याची बाब बनत आहे. त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. तर काही ठिकाणी या कोंडीतून बाहेर पडताना वाहनधारकांची दमछाक होऊ लागली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीचा प्रप्रश्न मात्र कायम आहे. शहरातील मुख्य रस्ते, सिग्नल, उड्डाण पूल आणि चौकातदेखील वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरात अस्ताव्यस्तपणे लावलेली वाहने, जागोजागी करण्यात आलेली खोदाई, ठिकठिकाणी पडून असलेले दगड व मातीचे ढिगारे यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. विविध विकासकामासाठी खोदाई केली जाते, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत दगड मातीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रस्त्यावर दगड मातीचे ढिगारे वाहतुकीसाठी अडचणीचे ठरू लागले आहेत.
शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी रहदारी पोलिसांची कमतरता असते. त्यामुळे वाहने मनमानीप्रमाणे चालविली जातात. शिवाय अऊंद रस्त्यावरून अवजड वाहने येऊ लागल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावावी, अशी मागणीदेखील होऊ लागली आहे.
यात्रा-जत्रा आणि लग्नसराईला सुऊवात झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. त्याबरोबर वाहनेदेखील मोठ्या प्रमाणात येऊ लागली आहेत. त्यामुळेच शहरातील खडेबाजार, कडोलकर गल्ली, गोंधळी गल्ली, पांगुळ गल्ली, माऊती गल्ली, फोर्ट रोड, नरगुंदकर भावे चौक, आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील रस्ते स्मार्ट झाले पण वाहतूक कोंडीचा प्रश्न मात्र कायम आहे.