अधिकाऱ्यांनी कोणाचे आदेश ग्राह्य धरावे हे ठरवावे : बावकर
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील तिलोरी कुणबी समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु, तो प्रश्न निकाली निfघाला असतानाच जातपडताळणीचा प्रश्न निर्माण झाला. या संदर्भात रत्नागिरी येथे गुरूवारी जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा व अन्य संबंधित अधिकाऱ्यांसमवेत कुणबी समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.
जातपडताळणी समिती अध्यक्ष पडियार, उपायुक्त प्रमोद जाधव, सदस्य सचिव संतोष चिकणे यांच्यासमोर राजापूर -लांजाचे आमदार राजन साळवी यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष व ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी तिलोरी कुणबी समाजाची बाजू भक्कमपणे मांडली. जिल्ह्यातील तिलोरी कुणबी समाजाचे शैक्षणिक, राजकीय व नोकऱ्याबाबत मोठे नुकसान होण्याचा पश्न उभा ठाकला आहे. तिलोरी कुणबी’ समाजाला ‘कुणबी’ म्हणून विचारात घेऊन त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी येथील जातपडताळणी विभागीय समितीसमोर महत्वपूर्ण चर्चा झाली.