आदेश विचारे / नूल
सामानगडावर पूर्वेकडे आग्नेय कोपऱयात पूर्वाभिमुख अशा सुंदर आणि बलदंड अशा दरवाजाचे अवशेष सापडले आहेत. दुर्गवीरांच्या श्रमदानातून उत्कृष्ट असा ऐतिहासिक नजराणा समोर आणला आहे महाराष्ट्र पुरातत्वच्या विशेष परवानगीने अवशेष दिसल्याने उत्खननात हे अवशेष दरवाजाचे असल्याचे दिसून आले.
गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड दक्षिण करवीरची स्वराज्य दौलत म्हणून सुरेख ठेवणीचा गड म्हणून इतिहासप्रेमींमध्ये उल्लेखला जातो. या सामानगडाच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी गेल्या 5 वर्षापासून दुर्गवीर प्रतिष्ठानने घेतली आहे. अनेक वर्ष मोहिमांच्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जतन केले. त्याबरोबरच अनेक दुर्लक्षित मौलिक ठेवा इतिहास प्रेमींसमोर आणला असल्याने आणखी एका ऐतिहासिक ठेव्याने सामानगडाच्या वैभवात भर पडली आहे.
भोज काळातील बांधणी असलेला गड हा इष्टिका दुर्ग असून गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. वास्तू ताशीव जांभ्या दगडात साकारल्या असून भोज कालीन अवशेषांची जाणीव होते. पुढे शिवकालात या गडाच्या संरक्षण व संपन्न बनलेला गड शिवछत्रपती व मराठय़ांचा दुर्गबांधणी शैलीचा उत्कृष्ठ प्रकार आहे. शिवस्पर्शाने पुनित झालेला महाराष्ट्राच्या यच्चायावत पराक्रमाची महती सांगणाऱया सामानगड इंग्रजांच्या आक्रमणानंतर अनेक दर्जेदार वास्तू दुर्लक्षाने उध्वस्त झाल्या आणि पुढे स्वातंत्र्यानंतरही राज्यकर्त्यांची डोळझाक वृत्तीने अनेक वास्तू नष्ट झाल्या त्याचाच एक नमुना म्हणून या दरवाजाकडे पाहावे लागेल. 90 अंश कोनात असलेला दरवाजा मनोवेधक आहे त्याचबरोबर झालेली बांधणी भक्कम होती पण रस्ता निर्मितीने दरवाजा बुजला होता.
वरवर पाहता दरवाजा सहजगत्या निदर्शनास येत नव्हता पण दुर्गवीर कैलास परिट याने तटबंधीची बांधणी चाणाक्ष पणे ओळखली व दोन महिन्यापासून या ठिकाणी अवशेष असण्याची शक्यत्येने या ठिकाणी सातत्याने केलेल्या श्रमदानामुळे हा मौलिक ठेवा सापडला. या उत्खननात दुर्गवीर कैलास परीटचा खारीचा वाटा आहे. यामध्ये दरवाजाचे अतिशय सुबक नक्षीदार दगडांचे अनेक अवशेष सापडले आहेत. पण गडाची तटबंदीची बाजू कोसळल्याने उत्तरेकडील ढाच्या व दरवाज्याचा उंबराच शिल्लक आहे. आता हा दरवाजा कोसळला असला तरी दरवाजाचे दगड सुस्थितीत आहेत. पुरातत्व खात्याने प्रयत्न केल्यास दरवाजाच्या एका ढाच्याची पुर्न उभारणी होऊ शकते.
सापडलेल्या नक्षीदार अवशेषाचे ‘कार्बनडेटींग’ केल्यास उभारणीचा कालावधी समोर येईल. द्वाराची उभारणी कोणत्या राजवटीत झाली हे समजेल. पण नववर्षाच्या सुरूवातीला दुर्गवीरांनी हा मौलिक ठेवा समोर आणल्याने इतिहासप्रेमी दुर्ग अभ्यासक यांना औत्सुक्य व कुतुहल निर्माण होईल यात शंका नाही. या मोहिमेत डॉ दिलीप मांजरेकर, दिपक जगदाळे, श्रवण आरबोळे, गडपाल सतिश चव्हाण, अवधुत येडुरकर, विजयराज टेंबुगडे, सचिन गोईलकर, अक्षय सुर्वे यांच्यासह दुर्गवीरांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला व पुरातत्व चे संचालक विलास वहाणे, वन खात्याचे डी बी काटकर, दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासूरकर, संवर्धन समितीचे सुनिल चौगुले, ऍड. दिग्विजय कुराडे, प्रशांत बाटे यांचे सहकार्य लाभले
महाराष्ट्र भर गेली चौदावर्ष गड संवर्धन करताना असा मौलिक ठेवा समोर आणताना मनस्वी आनंद होतो हे दुर्गवीरांच्या कष्टामुळेच घडले असून याची नोंद गडवास्तूंमध्ये करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे प्रयत्न करणार आहे. पडलेला दरवाजाचा ढाचा शास्त्राsक्तपणे कसा उभारता येईल यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
संतोष हासूरकर
(अध्यक्ष दुर्गवीर प्रतिष्ठान)