शांतता बैठकीमध्ये पोलीस निरीक्षकांचे कार्यकर्त्यांना आवाहन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येत्या दोन-तीन दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्यामुळे कंग्राळी बुद्रुक किर्यात परिसरामध्ये गणपती सण शांततेमध्ये साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शुक्रवारी शांतता बैठक घेण्यात आली. यावेळी काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांनी मार्गदर्शन केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील होत्या.
व्यासपीठावर काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ, ग्रा. पं. उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य दादासाहेब भदरगडे, पीडीओ जी. आय. बर्गी, ग्रा. पं. सदस्य प्रदीप पाटील, बाबू दोडमनी उपस्थित होते.
ग्रा. पं. कर्मचारी यल्लाप्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक गुरुनाथ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उपस्थित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक गुरुनाथ म्हणाले, सर्व धर्मियांचे आराध्य दैवत गणपती आहे. तो उत्सव चार-पाच दिवसावर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सव शांततेत साजरा करावा, मंडपला लावलेल्या स्पीकरचा आवाज कमी ठेवावा. अनंतचतुर्थी दिवशी वेळेत गणेशमूर्तींचे विसर्जन करुन पोलीस खात्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासंदर्भात मनोगत व्यक्त केले.
बैठकीला ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, सदय़ाप्पा राजकट्टी, तानाजी पाटील, उमेश पाटील, सदस्या भारता पाटील, मेनका कोरडे, रेखा इंडीकर, अर्चना पठाणे, कल्पना पवार, शकुंतला सिंग, रेखा सुतार, मल्लेशी दुड्डी, सुचिता कोळी, रत्ना व्हन्नपन्नावरसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार यल्लाप्पा पाटील यांनी केले.