शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thakre ) आणि वंचित बहुजन आघाडीचे ( VBA ) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा झाल्यानंतर दोनच दिवसांनी वंचित बहूजन आघडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपाबरोबर असल्याचे खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना मविआतील नेत्यांवर आरोप करताना शब्द जपून वापरावे असा सल्ला दिला.
हेही वाचा >>> मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला स्थान मिळावे
माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी मी सहमत नाही. चार दिवसांपूर्वीच शिवसेना आणि वंचित आघाडीची युती झाली असल्याने प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेत्यांशी अशी विधाने करणं आम्हाला मान्य नाहीत. शरद पवार महाराष्ट्र आणि देशाचे उत्तुंग नेते आहेत. शरद पवार भाजपाबरोबर आहेत, म्हणणं त्यांच्या कारकीर्दीवर मोठा आरोप आहे.” असे असा स्पष्ट मत खास. संजय राऊत यांनी केले.
त्याच बरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “शरद पवार भाजपाच्या बाजूने असते, तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केली नसती. पवारांनी प्रत्येकवेळी भाजपाला रोखण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या एकीचा विषय येतो, तेव्हा शरद पवारांचं नाव प्रामुख्यानं येते. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर बोलताना शब्द जपून वापरायला हवेत,” असा सल्ला संजय राऊतांनी दिला आहे.