कोल्हापूर प्रतिनिधी
येणारी लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपावर अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र आतापर्यंत शिवसेनेचे सर्वात जास्त खासदार निवडणूक आले आहेत. त्या निवडून आलेल्या जागा कायम ठेवायच्या आणि उरलेल्या जागांचे समान वाटप करायचं असा फॉर्म्युला आला तरच सहनभुतीपूर्वक विचार होऊ शकतो असे स्पष्टीकरण खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. तसेच 22 आमदार आणि 9 खासदार आपल्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर बोलताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाची चिंता करू नये. त्याच्या पक्षात एक ना धड बाराभर चिंध्या सुरू आहेत. त्याकडे आधी त्यांनी पाहाव. आणि शिंदे गटाला सोबत घेतल्याने भाजपला जी पनोती लागली आहे ते त्यांनी पाहावं.” असा त्यांनी सल्ला दिला.
नितेश राणे यांच्यावर टिका करताना ते म्हणाले, “नितेश राणे म्हणजे आमच्यासाठी चिंपाट माणूस आहे. भाजपने त्याला फक्त भुकण्यासाठी ठेवलं आहे. भुकणार कुत्रं कधी चावत नसत. किरीट सोमय्या यांनी आजपर्यंत ज्या तक्रारी केल्या त्या आजपर्यंत दुसऱ्याच्य़ा बदनामीसाठीच केले आहे. त्यातून काहीही सिद्ध झालं नाही.” असे ते म्हणाले.
शेवटी बोलताना त्यांनी 22 आमदार आणि 9 खासदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगून गद्दारी करणाऱ्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद राहणार असेही खासदार विनायक राउत यांनी सांगितले.