सातारा प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून 18 जून ते 23 जून या कालावधीत मार्गक्रम करणार आहे. या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला तयारीचा आढावा.
लोणंद ता. खंडाळा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचे टँकरची संख्या वाढवावी अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्या ठिकाणावरून पाणी टँकर मध्ये भरले जाणार आहे त्याची पाहणी करावी. आरोग्य विभागाने जास्तीत जास्त पदके हे फिरते ठेवावे म्हणजे तात्काळ कोणत्याही वारकऱ्यांला आरोग्य सुविधा पुरवता येतील. पालखी सोहळ्यासाठी जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवावा. यासाठी शेजारील जिल्ह्यांची मदत घ्यावी. प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्यात येणार आहेत.