भागवत वाघ , वैराग प्रतिनिधी
Solapur News : नुकतेच संभाजीराजे छत्रपती यांनी बार्शी व वैराग येथे “स्वराज्यची सरशी मिशन बार्शी” म्हणत जाहीर सभेत विधानसभेला येथून उमेदवार देण्याची घोषणा केली. यामुळे राऊत समर्थकात अस्वस्थता तर सोपल समर्थकांत आनंदी वातावरण असले तरी आता कोणाला करणार बेवारसी असा प्रश्न पडला आहे.छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी बार्शीत तालुक्याचा दौरा करून स्वराज्य पक्षाच्या शाखा सुरू करण्याचा श्रीगणेशा केला.बार्शी विधानसभेला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने व आमदार राऊत यांना बार्शी व वैराग येथील त्यांच्या सभेत टार्गेट केले.त्यामुळे मराठा मते स्वराज्यकडे जातील कि काय या भीतीपोटी घनिष्ठ राऊत समर्थकात अस्वस्थता दिसत आहे.तर सोपल समर्थकांत आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राजेंद्र मिरगणे व शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर हे देखील विधानसभेच्या तयारीत आहेत.सध्या आंधळकर उद्धव सेना सोडून शिंदे सेनेत दाखल झालेत. शिवाय उमेदवारी मिळवून विजयी होणार असल्याचा सतत दावा करतात.मात्र राज्यस्तरावर भाजप सेना युती आहे व राऊत हे अपक्ष आमदार असले तरी फडणवीसांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे त्यांन तिकिट मिळणार हे नक्की असणार.असे घडले तर आंधळकरांना युती धर्म म्हणून राऊतांचा प्रचार करावा लागेल मात्र तसे घडण्याची शक्यता खुप कमी आहे.कारण राऊत आंधळकर यांचा शाब्दिक वाद खुप टोकाच्या भाषेत सुरू असतो.तेव्हा आंधळकर अपक्ष किंवा सोपलांना सहकार्य करतील .जर अपक्ष राहिले तर सोपलांना याचा जास्त फटका बसेल.तर दुसरीकडे राजेंद्र मिरगणे हे भाजपाचे आहेत.त्यांच आणी राऊत यांचेही संबंध वादग्रस्तच राहिलेत परंतु अलीकडील काही महिन्यापासून ठराविक भेटीमुळे यांच्या संबंधातात सुधारणा होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.त्यामुळे ते राऊतांना सहकार्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणी जर निवडणुकीला उभारले तर राऊतांना तोटा होईल. सध्या राऊत यांच्या बर्याच कार्यकर्त्यांमध्ये सुप्त नाराजी आहे. तर सोपल वेट अँन्ड वाच भूमिकेत असल्याने अशा कार्यकर्त्यांवर नजर ठेवुन आहेत. तर बार्शी शहरामध्ये सोपलांचा बालेकिल्ला नागेश अक्कलकोटे हे लढवुन त्याना आघाडी मिळवुन देण्यात सक्रिय दिसुन येतात. तर राऊत यांच्याकडे त्यांचे धाकटे बंधू विजय राऊत प्रयत्नाचा पराकष्टा करून जास्तीत जास्त मते खेचण्याचा प्रयत्न करत असतात.परंतु बार्शी शहरामध्ये लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात असल्याने याचा फायदा आजवर सोपलांना झाला आहे.काहि प्रमाणात बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्यामुळे लिंगायत मतामध्ये विभाजन होवु शकते.
दरम्यान, स्वराज्य पक्ष उमेदवार देणार हे तर नक्की झालेय.त्याच्या तालुक्यात किमान पन्नास तरी शाखा असुन दहा तरी सदस्य आहेत.आणी त्यांना मिळालेला प्रतीसाद पहाता आजच्या घडीला स्वराज्य पक्षाची किमान विस हजारापेक्षा जास्त मतदार निर्माण झाला आहे.यात निम्मे अधिकसंख्येने मराठा असुन तो गतवेळी तो राऊतांनी खेचुन घेतला आहे.तर पाच ते सात टक्के अल्पसंख्याक व दहा पंधरा टक्के बहुजन मतदार राहिल व तो बहुतांश सोपलांचा असेल.म्हणजे स्वराज्य पक्षाचा फटका हा पंच्चेविस ते तिस टक्के सोपलांना तर उर्वरित राऊतांना बसेल.मात्र राऊतांची सध्या तरी जमेची बाजू म्हणजे गतवेळी सोपलांना सोडुन राष्ट्रवादी कडुन उमेदवार राहिलेले निरंजन भुमकर सध्या अजित पवार गटात गेल्याने महायुती टिकल्यास किमान दहा ते पंधरा हजार मते घेवुन ते राऊतांना सहकार्य करतील. तसेच गतवेळी राऊत अपक्ष राहिल्याने ट्रॅक्टर चिन्हावर लढले होते.आणी याच वेळी ट्रॅक्टरसारखे दिसणारे रोड रोलर चिन्ह घेवुन आणखीन एक अपक्ष निवडणूक लढवत होते व त्याना पंधरा हजाराच्या आसपास मते मिळाली होती व ती राऊत यांचीच होती.ती किमान विस हजारतरी मते राऊतांकडे सध्या तरी जातील असे चित्र आहे तर दुसरीकडे मोठे जनमत असलेले माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले राऊतापासुन दुरावत राष्ट्रवादीत स्वतंत्र बस्तान बसवत आहेत.त्यानी अद्याप ही कोणत्या पवार गटातील आहेत हे स्पष्ट केले नसले तरी त्यांची आमदार होण्यासाठी धडपड पहाता ते शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यास खुप प्रयत्नशील राहतील.मात्र महाआघाडी टिकल्यास व राऊतांवर नाराज असल्याने ते सोपलांना मिळाल्यास ते देखील दहा पंधरा हजार मतांचा गठ्ठा सोपलांना पुरवु शकतील.
तसेच राऊतांबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रकर्षाने नाराजी जाणवते विशेषतः वैराग भागात मात्र ती त्यांच्या कार्यकर्त्यांनी तिथपर्यंत पोहचवली तर ती कशी दूर करतात यावरही बरेच अवलंबून आहे.अन्यथा गतवेळी आघाडी दिलेला वैराग भाग यावेळी पिछाडीवर पाठवेल.तसेच बाजार समितीमधील काही व्यापारी वर्गांना दस्तुरखुद्द राऊत किंवा मुलगा चेअरमन रणवीर यांच्या कडुन त्रास झाला नाही परंतु त्यांच्या दुय्यम नेत्याच्या सांगण्यावरून नोटिसा येतात असाही समज निर्माण झाला आहे मात्र याचा फटका त्यांना बसणार आहे.त्याचबरोबर राऊतावर सतत दडपशाही दादागिरीचा विरोधकाकडुन आरोप होत असतो.हे होत असले तरी अद्याप पर्यंत अपवाद वगळता पोलीस दफ्तरी अशी नोंद दिसुन येत नाही.असे असताना विरोधक देखील शांत राहताना दिसुन येत नाही.एकंदर आजचे राजकिय वातावरणात राऊतांना धक्कादायक दिसत असले तरी सोपलांनाही सर्वसामान्य समजतात एवढे सोपे नाही.त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात त्यावरच चित्र स्पष्ट होईल.