ग्रामस्थों किणये ग्रामपंचायतीला निवेदन
वार्ताहर /किणये
रणकुंडये गावाजवळ असलेल्या खडीमशीन्समुळे ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. येथे वाहतूक करणाऱया अवजड वाहनांचा गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच गावचा मुख्य रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या भागातील सदर खडीमशीन्स बंद कराव्यात. अशी मागणी ग्रामस्थांतर्फे किणये ग्रामपंचायतकडे शुक्रवारी केली आहे. रणकुंडये गावाजवळ तीन खडीमशीन्स आहेत. त्या मोठय़ा स्वापाच्या आहेत. त्यामुळे परिसरातील शिवारातील पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. खडीमशीनमधील धूळ, माती काजू, आंबा झाडांवर पडू लागली असल्यामुळे सदर काजू उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. गावासाठी या मशीन्स धोकादायक ठरू लागल्या आहेत. त्यामुळे सदर खडीमशीन मालकांना सूचना कराव्यात असेही निवेदनात म्हटले आहे. खडीमशीन्ससाठी चीपिंग, बोर्डिंग व खडी यांची वाहतूक करण्याकरिता टिप्पर, डंपर या वाहनांचा उपयोग करण्यात येतो. डंपर गावच्या मुख्य रस्त्यावरून सुसाट धावतात. रस्त्याच्या बाजूलाच प्राथमिक मराठी शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला
आहे.
अवजड वाहतूक बंद करण्यी मागणी
अवजड वाहतुकीमुळे गावचा मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडू लागले आहेत. सदर अवजड वाहनांची वाहतूकही या रस्त्यावरून बंद करण्यात यावी अशा मागणी करण्यात आली आहे. निवेदन ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा अर्चना चिगरे, उपाध्यक्ष भरमाण्णा पाटील यांच्याकडे देण्यात आले. निवेदनावर मंगेश पाटील, सतीश पाटील, हनुमंत पाटील, महेश पाटील, प्रेम पाटील, निंगाप्पा पाटील, भरमानी पाटील, दयानंद पाटील, परशराम पाटील, मारुती पाटील ,मंगेश गुंडू पाटील, मारुती झिलू पाटील, मारुती एस. पाटील, किरण लाटकर, रहमान शेख आदींच्या सह्या आहेत.