बेळगाव : मोबाईल चोरी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी आता सीईआयआर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून या सुविधेचा वापर करून 18 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या हस्ते संबंधितांना मोबाईल परत करण्यात आले. यापुढे मोबाईल चोरी झाला तर नागरिकांनी त्वरित जवळच्या पोलीस स्थानकात फिर्याद द्यावी किंवा केएसपी (e-lost) अप्लिकेशनच्या माध्यमातून पोर्टलमध्ये तक्रार करावी व सीईआयआरचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. सीईएन विभागाचे पोलीस निरीक्षक जॉक्सन डिसोजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.
Previous Articleखूशखबर! महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत लागू
Next Article जिजामाता बँकेच्या अध्यक्षपदी भाविकाराणी होनगेकर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.