रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी -नागपूर महामार्ग काल रात्री नाणीज हायस्कुलजवळ खचला होता . त्यात दोन ट्रक रुतून बसले होते. त्यामुळे सारी वाहने अडकून पडली होती . मात्र या मार्गावरील दूरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर – रत्नागिरी वाहतूक आता सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोकण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रात्री १२.३० च्या दरम्यान रत्नागिरी -नागपूर महामार्गावर नाणीज येथे रस्ता खचला होता. त्यात दोन वाहने रुतून बसली होती. या सर्व प्रकारामुळे सारी वाहने दुतर्फा अडकून पडली होती. रात्रीच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आता या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.