खांडोळा-माशेल येथील सरकारी महाविद्यालयात ‘अनुवाद’ पदविका अभ्यासक्रमाला प्रारंभ
वार्ताहर /माशेल
आजच्या ई-माध्यमाच्या युगात ‘अनुवादक’ हा दोन भाषेला जोडणारा सेतू बनला आहे. एका भाषेतून दुसऱया भाषेत ही अनुवादकाची सृर्जनशील कला पुर्वेला उगवणाऱया सुर्यासारखी निरंतर लखलखत राहील. स्थानिक भाषेला वैश्विक स्तरावर पोचविण्याचे सामर्थ अनुवादाच्या माध्यमातून सार्थ झाले आहे, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाच्या निवृत्त प्रा. किरण बुडकुले यांनी केले.
खांडोळा-माशेल येथील सरकारी महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे ‘अनुवाद’ विषयावर नुकत्याच सुरू केलेल्या डिप्लोमा (पदवीका) अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होत्या. यावेळी उच्च शिक्षण संचलनालय संचालक प्रा. एफ एम नदाफ, दैनिक तरूण भारत गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. पुर्णकला सामंत, हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. आशा गेहलोत व इतर मान्यवर उपस्थित होते. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की आज अनुवादासाठी सहज सोप्या उपलब्ध असलेली सामाजिक माध्यमे हाताळताना दक्षता पाळणे अंत्यत गरजेचे आहे. भाषेचे सखोल ज्ञान आत्मसात केल्यामुळेच अनुवादासारख्या अभ्यासक्रमाला चालना मिळेल असेही त्या म्हणाल्या.
अनुवादकासाठी भाषेवरील प्रभूत्व महत्वाचे-सागर जावडेकर
सागर जावडेकर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना म्हणाले संवाद साधताना भाषेचा उपयोग वापर सर्वाधिक होत असतो, कोणत्याही दोन भाषेवर प्रभूत्व असलेल्यासाठी अनुवाद ही सुवर्णसंधी असून प्रत्येक क्षेत्रात ती काळाजी गरज बनत चालली आहे. अनुवादीत साहित्यालाही आज साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त होऊ लागलेले आहे. उत्तम अनुवाद करणाऱया उमेदवारासाठी ई-मिडीया क्षेत्रात वाढती मागणी असून आकाशवाणी, दुरदर्शनवर भाषातरांसाठी +अनेक संधी उपलब्ध असल्याचे जावडेकर यांनी नमूद केले.
प्रा. नदाफ यांनी अनुवाद अभ्यासक्रम वर्गाचे प्रथमच गोव्यात सुरू केल्याने गोवा सरकारचे अभिनंदन केले. या अभ्यासक्रमामुळे परदेशाच्या विविध साहित्याची देवाणघेवाणीसाठी राज्यासाठीही एका वेगळा उपक्रम ठरणार असल्याचे भाकित त्यांनी यावेळी बोलताना केले.
खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयात सुरू केलेल्या अभ्यासक्रमामुळे अनुवादाची आवड असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ प्रात्प होणार आहे. मान्यवरांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले त्यानंतर भाषा साहित्य-रोजगारांच्या विविध संधी या विषयावर तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वागत प्रा. डॉ. पुर्णकला सामंत, प्रास्ताविक डॉ. आशा गेहलोत यांनी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपाली सुतार यांनी केले. डॉ. लोपमुद्रा बॅनर्जी यांनी आभार मानले.