अथणी तालुक्मयातील वळिवामुळे कोटय़वधींचे नुकसान : बेदाणे उत्पादक, बागायतदार मोठय़ा अडचणीत
प्रतिनिधी /अथणी
तालुक्मयात एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱया आठवडय़ात झालेला वळीव पाऊस आणि वाऱयामुळे सुमारे 1200 टन बेदाण्यांचे नुकसान झाले आहे. यातून कोटय़वधी रुपयांचा फटका द्राक्ष बागायतदार आणि बेदाणे उत्पादकांना बसला आहे. या नुकसानीची दखल घेत प्रशासनाने तात्काळ सर्व्हे काम हाती घेताना नुकसानभरपाई देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी द्राक्ष बागायतदार आणि बेदाणे उत्पादकांतून होत आहे.
विजापूर जिल्हा वगळल्यास मोठय़ा प्रमाणात अथणी तालुक्मयात द्राक्षाचे पीक घेतले जाते. अथणी तालुक्मयात सुमारे 25 हजार एकरमध्ये द्राक्ष पीक घेतले जाते. द्राक्ष, बेदाणे आणि बेदाणे निर्मिती शेड असे 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे द्राक्ष बागायतदार आणि बेदाणे उत्पादक सांगत आहेत. बेदाणे निर्मितीसाठी वाळत घातलेल्या उत्पादकांना वळिवाच्या तडाख्मयाने मोठा आर्थिक फटका बसला आहे. आणखी 15 दिवसात बेदाण्यांची निर्मिती होऊन त्याची विक्री झाली असती. मात्र, निसर्गाच्या अवकृपेने हातचा घास वळिवाने हिरावून घेतल्याने बेदाणे उत्पादकांतून चिंता व्यक्त होत आहे.
फंगस रोगामुळे दर्जावर परिणाम
द्राक्ष हंगाम काळात द्राक्ष पिकांवर फंगस रोगामुळे फटका बसला होता. यामुळे उत्पादनात घट होण्याबरोबरच त्याच्या दर्जावरही परिणाम झाला होता. तर एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱया आठवडय़ात झालेल्या वळिवामुळे 1200 टनाहून अधिक बेदाणे खराब झाले आहेत. याशिवाय वारा आणि पावसामुळे बेदाणे करण्यासाठी उभारलेले शेडही उद्ध्वस्त झाले असून त्याचेही कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागायतदार संकटात आल्याने राज्य सरकारने त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी नुकसानीची पाहणी करून जात आहेत. फक्त पाहणी न करता लवकरात लवकर भरपाई मिळवून नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
नुकसानभरपाई द्यावी
माजी आमदार व तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष शहाजान डोंगरगाव यांनी, राज्य सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱयांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी. यासाठी नुकसानीचा सर्व्हे तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी केली.
नुकसानीचा सर्व्हे करण्यात येईल
वळिवामुळे बेदाणे उत्पादक आणि द्राक्ष बागायतदारांचे नुकसान झाले आहे. पहिल्यांदा आम्ही अंदाजे सर्व्हे करून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकाऱयांमार्फत राज्य सरकारला पाठवितो. त्यानंतर संपूर्ण सर्व्हेचा आदेश मिळाल्यानंतर तात्काळ सर्व्हे करण्यात येईल, असे तहसीलदार दुंडप्पा कुमार यांनी सांगितले.