उत्तर कर्नाटकात उद्भवलेली पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी सातत्याने होत असल्याने बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ यांनी या समस्येचा तोडगा काढण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
उत्तर कर्नाटकात उद्भवलेली पाण्याची समस्या सोडविण्याकरिता सर्व अभियंते आणि जिल्हाधिकाऱ्याकडून माहिती घेण्यात आली आहे. गेल्यावर्षी मलप्रभा जलाशयात ८. १ टीएमसी इतकी पाण्याची पातळी होती मात्र यंदा ५.६ टिमएमसी एवढी राहिली असून हिप्परगी जलाशयात गेल्यावर्षी १. २ टीएमसी पाण्याची पातळी होती यंदा १. २ टीएमसी आहे तर आलमट्टी जलाशयात गेल्यावर्षी २. ३ टीएमसी पाण्याची पातळी होती यंदा तीच ५ .१ टीएमसी एवढी शिल्लक आहे. येणाऱ्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडल्यास पाण्याची टंचाई दूर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
Trending
- पंतप्रधान मोदींची आज जाहीर सभा
- विजयासह राजस्थानचे अव्वल स्थान अधिक भक्कम
- दिल्ली प्ले ऑफच्या शर्यतीत कायम
- गुजरातचा आज उत्साह वाढलेल्या ‘आरसीबी’शी सामना
- उत्तराखंडच्या जंगलात अग्नितांडव
- निवडणुकीनंतरच ‘त्या’ बेकायदेशीर इमारतींवर कारवाई
- विजयपथावर परतण्यास उत्सुक चेन्नई-हैदराबादमध्ये आज लढत
- अखेर पिसाळलेल्या कुत्र्याला पकडले