भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाचा प्रश्न : मनपा-सामाजिक संघटनांचा पुढाकार आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
जीवघेण्या रेबीजला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 700 श्वानांना ही लस दिली आहे. उर्वरित सर्व श्वानांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मोफत लसीकरण मोहीम चालणार आहे. श्वानपालकांनी याचा लाभ घेऊन जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन श्वानांना लस टोचून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेबीजला प्रतिबंध करण्यासाठी 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान अँटिरेबीज मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, विविध ठिकाणी भव्य रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून श्वानांना सुरक्षित केले जात आहे. जिल्हय़ात यांची संख्या 28 लाखांहून अधिक आहे. त्यामध्ये 80 हजार पाळीव कुत्री आहेत. बेळगाव तालुक्मयात 9 हजार 80 श्वान आहेत. दरम्यान, अलीकडे कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पशुसंगोपन खात्याने तब्बल 15 दिवस प्रतिबंधक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे.
शहरी भागात पाळीव कुत्र्यांची संख्या अधिक आहे. यासाठी रविवारी शहर उपनगरांतील चन्नम्मानगरमध्ये अँटिरेबीज मोहीम राबविण्यात आली. यावेळी 215 हून अधिक श्वानांना लस देण्यात आली. तालुक्मयातील 39 पशुवैद्यकीय दवाखान्यांतूनही सकाळी 10 ते 1 या वेळेत लस दिली जात आहे. अलीकडे पाळीव कुत्र्यांबरोबर भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. या कुत्र्यांना सामाजिक कार्यकर्ते किंवा संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांनाही प्रतिबंधक लस देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.
पशुसंगोपनतर्फे पंधरा दिवसांची लसीकरण मोहीम राबवून श्वानांना लस दिली जात आहे. मात्र, शहरातील 25 हजार भटक्मया कुत्र्यांना लस कोण देणार? हा प्रश्न आहे. दरवषी भटक्मया कुत्र्यांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यांची नसबंदी सुरू असली तरी बऱयाच भागामध्ये नवीन पिले जन्माला घातल्याचे दिसून येत आहे. कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात मनपा अपयशी ठरली आहे.
दरम्यान, भटक्मया कुत्र्यांकडूनच हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. मात्र, भटकी कुत्रीच लसीपासून वंचित आहेत. प्रथमतः भटक्मया कुत्र्यांनाच ही लस देणे आवश्यक असल्याचे मत प्राणीप्रेमींतून व्यक्त होत आहे.