अधिवेशनात श्रध्दांजली आणि अभिनंदन
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुपाच्या सत्रतात स्वर्गवासी झालेल्या नामवंत व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर काही जणांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपन्न केले त्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्रध्दांजली वाहण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये गोवा दमण दिव विधानसभेचे पहिले आमदार नारायण बी राव, गोवा दमण दिव पाचव्या विधानसभेचे मंत्री जॉयलदो सोझा आगियार, पर्यावरणप्रमी हेमा नाडकर्णी, पत्रकार प्रेमानंद गावकर, कोकणीप्रेमी नारायण मावजो, फादर क्लिफ्टॉन फर्नांडिस, केंद्रीय माजी कायदामंत्री अॅड. शांती भुषण, शिक्षणतज्ञ जे.ए.सी. फर्नांडिस द सोझा, स्वातंत्रसैनिक नागेश करमळी, जेष्ट गायीका वाणी जयराम, चित्रपट अभिनेता सतीष कौषिक, चित्रपट निर्माता प्रदिप सरकार, पत्रकार संजीव वेरेंकर, माजीमफुटबॉलपटू आंन्तानियो जोओ रिबेलो यांचा समावेश होता. अभिनंदन केलेल्या मध्ये नातू नातू या गाण्याला 95व ऑस्कर पुरस्कार मिळविल्याबद्दल गित रचना चंद्रा बोस, संगीतकार एम,एम. किरामणी, गायक राहुल सिप्लीगुंज व काल भैरव, तसेच दे ऍलीफंट व्हिस्पर या लुघूपटासाठी अॅस्कर पुरस्कार प्राप्त झाला असून या लघुपटाचे निर्माते दिग्दर्शक कार्तीकी गोन्साल्वीस, गुतीन मोंगा डग्लस ब्लूश व अचिनी जैन यांचे अभिनंदन करण्यात आले. अखिल भारतीय नृत्य संमेलनात दुसरे बक्षिस मिळविलेल्या वैष्णवी पै काकोडे. राष्ट्रीय चांपीयन स्पर्धेत दोन रजत आणि एक कास्य पदक मिळविणाऱ्या पॅरा टेबल टेनिस गोवा संघ यांचाही अभिनंदन करम्यात आले. गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव नाकारला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी हा प्रस्ताव मांडला होता. देशात प्रेम आणि एकता पसरवणे गुन्हा आहे का? गांधींच्या कन्याकुमारी ते काश्मीर पायी मोर्चाबद्दल बोलताना आलेमाओ यांनी विचारले.
रेशन दुकानदारांना लवकरात लवकर अनुदान द्यावे
रेशन देणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांची थकबाकी व इतर देय रक्कम तातडीने देण्याची मागणी पर्येच्या आमदार दिव्या राणे यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचनेतून केली. आमदार विजय सरदेसाई यांनी तर त्यांना गुजरात राज्याच्या धर्तीवर अनुदान देण्याची सूचना केली. नागरी पुरवठा मंत्री रवी नाईक यांनी त्या दुकानदारांचे पैसे त्वरित देण्यात येतील, असे आश्वासन दिले तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनुदानाच्या सुचनेवर विचार करण्याची तयारी दर्शवली. श्रीमती राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, रेशन धान्य दुकानदारांना ऊ. 2.30 असे कमिशन देऊ केले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. त्यांचे खर्च इतके वाढले आहेत की, त्यांना रेशन दुकान चालवणे अवघड बनले असून ती डोकेदुखी झाली आहे. ती दुकाने टिकवली नाहीत तर लोकांना धान्य मिळणे मुश्कील होणार आहे. म्हणून त्यांचे प्रश्न सोडवा आणि त्या दुकानदारांना काहीतरी मदत करा अशी विनवणी राणे यांनी केली. आमदार व्हॅन्सी व्हिएगश, आलेक्स रेजिनाल्ड व सरदेसाई यांनी राणे यांच्या लक्षवेधी सुचनेला मागणीला पाठींबा दर्शवला तसेच त्या दुकानदारांना टिकवण्यासाठी सरकारने काहीतरी उपाय करावेत असे नमूद केले. नाईक यांनी त्यावर उत्तर देताना सांगितले की धान्य दुकानांची शिल्लक रक्कम त्यांना लवकरच मिळेल. शिवाय रेशन दुकानातून साखर, तेल वितरीत करण्याच्या विचार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
अनेक दुरुस्ती विधेयके सादर
गोवा नगरपालिका दुरूस्ती विधेयक, गोवा कृषी जमीन हस्तांतरण विरोधी दुरूस्ती विधेयक, गोवा विधिमंडळ डिप्लोमा दुरूस्ती विधेयक, अनधिकृत बांधकामे नियमन दुरूस्ती विधेयक, गोवा नगर-नियोजन दुरूस्ती विधेयक, गोवा महामार्ग कायदा दुरूस्ती विधेयक अशी अनेक विधेयके संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी विधानसभेत मांडली. प्रथम त्यांनी यांच्याकडे मांडण्यासाठी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे अनुमती मागितली व त्यांनी अनुमती दिल्यानंतर विधानसभेत सादर करण्यात आली. सर्व विधेयके सरकारी असून पूर्वीच्याच विधेयकात काही बदल-दुरूस्ती करून ती नव्याने मांडण्यात आली आहेत. सर्व विधेयके आवाजी मतदानाने सादर करण्यात आली आहेत.
बांधांचा दुरुस्ती करा
शेतातील बांध- बंधारे कोसळून खारे पाणी शेतात शिरले असलेल्या शेतीची नासाडी होते आणि शेती करता येत नाही अशी कैफियत हळदोणचे आमदार कार्लुस फरेरा यांनी लक्षवेधी सूचनेतून विधानसभा अधिवेशनात मांडली. बांधांच्या दुऊस्तीची जबाबदारी ठरवून ते तातडीने दुऊस्त करा आणी शेती वाचवा अशी मागणी फरेरा यांनी त्यावेळी बोलताना केली. माती संवर्धन, कृषी व जलस्रोत या तीनही खात्यापैकी हे बांध कोणाचा दुऊस्त करत नाही असे सांगून फरेरा यांनी बांध दुऊस्तीसाठी सरकारकडे निधी नाही की काय? अशी विचारणा केली. आमदार सर्वश्री व्हॅन्सी व्हिएगश, विजय सरदेसाई, व्रुझ सिल्वा, प्रेमेंद्र शेट, ऊडॉल्फ फर्नांडिस, केदार नाईक, वीरेश बोरकर, आलेक्स रेजिनाल्ड यांनी फरेरा यांच्या लक्षवेधी सूचनेचे समर्थन केले व त्यांच्या मागणीस पाठिंबा देऊन आपापल्या मतदारसंघातही हिच समस्या असल्याची माहिती दिली. त्यामुळे शेती करता येत नाही, केलेली शेती वाया जाते परिणामी लोकांमध्ये इच्छा असून शेती करणे शक्य होत नाही, अशा तक्रारी त्यांनी केल्या. मुळात या बांधांची दुऊस्ती कोणी करावी, हेच निश्चित नाही. बांध कोसळले, फुटले की शेतकरी तक्रारी करताता परंतु कोणतेच खाते कार्यवाही करीत नाही एकमेकांकडे बोटे दाखवतात अशा तक्रारी आमदारांनी केल्या. कृषीमंत्री रवी नाईक यांनी बांधांची पहाणी कऊन त्यांची दुऊस्ती लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.
अवैध कॅसिनोंवर होणार कारवाई : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन
राज्यात सुरू असलेल्या सर्व अवैध कॅसिनोवर कारवाई करण्यात येईल आणि उद्यापासून एकही बेकायदा कॅसिनो दिसणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. शून्य प्रहरात आमदार विजय सरदेसाई यांनी सदर बेकायदा कॅसिनोंचा मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी बोलताना सर्व बेकायदेशीर कॅसिनो बंद करण्यासंबंधी आपण कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर उद्यापासूनच एकही बेकायदा कॅसिनो राज्यात दिसणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यापूर्वी बोलताना सरदेसाई यांनी, राज्यात 50 पेक्षा जास्त कॅसिनो कार्यरत असून त्यातील काही ऑनलाइन तर उर्वरित बेकायदेशीर आहेत. या कॅसिनोमुळे राज्याचा महसूल बुडत असल्याचे म्हटले होते. एकट्या फातोर्डा मतदारसंघातच 13 अवैध कॅसिनो सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली. तुम्ही नेहमी लोकांना तक्रारी नोंदवायला सांगतात. आज आपण स्वत: या सभागृहात माहिती आणि नावेही देतोय, असेही सरदेसाई म्हणाले. ’बबलू’ नावाचा एक एलआयबी (गुप्तचर शाखेचा स्थानिक पोलीस कर्मचारी) आहे जो ’हफ्ता’ गोळा करतो. या हफ्त्यांतून सर्वांचा फायदा होतो, असा दावा सरदेसाई यांनी केला. बोटीवरील कॅसिनोकडून राज्याच्या तिजोरीत 40 कोटी ऊपये भरतात. मात्र, बेकायदेशीरपणे चालणारे कॅसिनो सरकारला काहीच देत नाहीत, तरीही कुणाचा तरी फायदा होत आहे. या बेकायदेशीर कॅसिनोवर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आपण सरकारला पत्र लिहीन, असे सरदेसाई यांनी सांगितले.
फोटो
तुळशीदास
नवभारत निर्माण करताना नवा गोवा निर्माण करणार
केंद्रातून नवाभारत निर्माण करण्याचे प्रयत्न सुऊ असताना नवा गोवाही निर्माण करणे गरजेचे आहे. गाव्यातील भाजप सरकार तेच प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आत्मनिर्भर भार आणि स्वयंपूर्ण गोवा करताना सरकारच्या प्रत्येक योजना अंतोदयापर्यंत पोचतील याची सरकार काळजी घेत आहे. सरकारने आरोग्य हाच कारभाराचा केंद्रबिंदू ठेवला असून त्यादृष्टीने सरकार काम करीत आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याने मंगळवारी माहिती आणि प्रिसध्दी खात्यातर्फे पर्वरी विधानसभेतील सभागृहात खास कायर्क्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी सभापती रमेश तवडकर, मंत्री विश्वजीत राणे, निलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, माविन गुदिन्हो, रवी नाईक आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोविंद गावडे, नीळकंठ हळणर्कर व इतर व्यासपिठावर उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, त्यांचे सरकार लोकांच्या वाहतुकीला मदत करण्यासाठी नवीन वाहतूक व्यवस्था सुरू करणार आहे. “परिवहन विभाग लोकांना गतिशीलतेमध्ये मदत करण्यासाठी नवीन वाहतूक गतिशीलता प्रणाली सुरू करणार आहे. मोबिलिटी प्लॅनचे उद्दिष्ट संपूर्ण गोव्यात मार्गांचे योग्य नेटवर्क उभारणे आहे ज्यामुळे राज्यातील सुरळीत आणि त्रासमुक्त वाहतूक सुलभ होईल,’ असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. मोबिलिटी प्लॅनमध्ये जेट्टी कनेक्टिव्हिटी, विमानतळ कनेक्टिव्हिटी, मल्टी-मॉडेल ट्रान्सपोर्ट इंटिग्रेशन, मोबिलिटी हब, बस स्टॉपचे जाळे, मालवाहतूक कॉरिडॉर आणि ट्रकच्या हालचालींसाठी मालवाहतुकीचे वेळापत्रक आणि फूटपाथ सुधारण्यासाठी योग्य धोरणांचा समावेश असेल. असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले. “आम्ही आरोग्य हा शासनाचा केंद्रबिंदू मानला आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने गोव्यात कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होईल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्र च्या धर्तीवर विशेष आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे उभारण्याबरोबरच सर्व आयुर्वेदिक डॉक्टर आणि व्यावसायिकांच्या सहभागाने वैद्यकीय आणि निरोगी पर्यटनाला राज्यात गती येईल. अशी सुमारे 41 आरोग्य आणि वेलनेस केंद्रे सुरू केली जातील जिथे आयुष डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध असतील. “राष्ट्रीय आयुष मिशन योजनेंतर्गत 50 खाटांची दोन आयुष ऊग्णालये लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. पेडणे तालुक्यातील धारगळ येथे 8 डिसेंबर रोजी आयुष ऊग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे,” डॉ सावंत म्हणाले.संपूर्ण मंत्रिमंडळ एक टीम म्हणून काम करत असल्याने सरकार विविध विकासात्मक प्रकल्प हाती घेऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. म्हादईवर बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, म्हादई प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि नदीचे पाणी वळवण्यापासून वाचवण्यासाठी त्यांचे सरकार काम करत आहे. त्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, आणि म्हादई नदीचे पाणी वळवण्यापासून संरक्षण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सांवंत म्हणाले.यावेळी सरकारच्या वर्ष पूर्तीनिमत्त पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम गावकर यांनी केले तर त्यांनीच शेवटे उपस्थितांचे आभार व्यक्त केले.