देवराष्ट्रे, वार्ताहर
सागरेश्वर अभयारण्यातुन वन्यप्राणी बाहेर पडुन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.तरी अभयारण्याच्या कुंपनाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी आ. विश्वजित कदम यांनी विधानसभा अधिवेशनात केली.
यावेळी विश्वजित कदम म्हणाले,सागरेश्वर अभयारण्यातील वन्यप्राणी बाहेर पडुन शेतीचे नुकसान होत आहे.देवराष्ट्रे, मो. वडगाव,आसद,कुंभारगाव,तुपारी,घोगाव येथील शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाने मेटाकुटीस आला आहे.अभयारण्याच्या कुंपनाचा प्रस्ताव वनविभागास दिला आहे,तरी अभयारण्याच्या कुंपनास निधी मंजुर करून शेतीचे नुकसान थांबवावे.
सागरेश्वर अभयारण्य हे मानवनिर्मित आहे.येथे विविध जातीचे प्राणी,पक्षी आढळतात.येथे हरणांची संख्या मोठी आहे.अभयारण्यात चारा नसल्याने हे वन्यप्राणी बाहेर पडुन शेतीचे नुकसान करत आहेत.परिसरात अनेक ठिकाणी कुंपन तुटले आहे.अभयारण्य प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.विश्वजित कदमांनी कुंपनाचा प्रश्न विधानसभा अधिवेशनात उपस्थित केल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.