नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक गावांवर संकट, दोन दिवसांपासून पाणी टंचाई
प्रतिनिधी /वाळपई
पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत सत्तरी तालुक्मयातील अनेक नद्यांवर बांधलेल्या बंधाऱयाचे पाणी सध्या येणाऱया पावसाची खबरदारी घेऊन सोडलेले आहे. मात्र याचा परिणाम सत्तरीतील अनेक गावांच्या पाणी पुरवठयावर होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसापासून अनेक ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
बंधाऱयाचे पाणी सोडल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी असलेले पाण्याचे पंप पाणी खेचण्यात असमर्थ ठरले आहेत. परिणामी अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचे आढळून आले आहे. कदाचित पावसाळा लांबल्यास याचे गंभीर परिणाम आणखी काही दिवस लोकांना सोसावे लागतील.
यासंदर्भात माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, म्हादई, रगाडा व इतर नद्यांवर सरकारने छोटे बंधारे उभारलेले आहेत. उन्हाळी मोसमात पाण्याचा साठा रहावा या दृष्टिकोनातून अनेक नद्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱयातून पाणी अडविण्यात येत असते. सदर पाणी अनेक गावांना पिण्यासाठी पुरविण्यात येते. सध्या पावसाळी हंगाम जवळ आला आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून जलसिंचन खात्याने अडविण्यात आले पाणी बंधाऱयातील लोखंडी फळय़ा काढल्यामुळे वाहून गेले आहे. यामुळे याचा परिणाम पाणी पुरविण्यावर झालेला आहे.
पंप पडले ओस
म्हादई नदीवरील गांजे येथील बंधाऱयावर अडवलेले पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाण्याची पातळी खाली गेली, त्यामुळे नदी किनारी असलेले पाणी खेचण्याचे पंप ओस पडले आहेत. गुळेली येथे पुलालगत पाणी खेचायचा पंप आहे. या पंपाच्या साहाय्याने उंचावर बांधण्यात आलेल्या मोठय़ा दोन टाक्मयात पाणी साठवून त्यावर प्रक्रिया करून ते गुळेली परिसरात पुरवले जाते.
सार्वजनिक बांधकाम खाते पाणी विभागा मार्फत या ठिकाणी काहीतरी हालचाल करून ज्या ठिकाणी पाणी आहे. त्याठिकाणी पर्यंत चर मारुन किंवा पाईप त्याठिकाणापर्यंत पाणी पोचवण्यासाठी तरी प्रयत्न करायला हवे होते. परंतु सध्या या ठिकाणी असे काही काम चालताना दिसत नाही. त्यामुळे अजून किती दिवस असे पाण्यावाचून गुळेली परिसरातील लोकांना काढावे लागणार असा प्रश्न या लोकांना पडला आहे.
दोन दिवस पाणी नसल्याकारणने गुळेली भागाचे पंच अनिल गावडे यांनी संबंधित अधिकाऱयाशी चर्चा करून सुद्धा काहीच साध्य झाले नाही. गुळेली ग्रामपंचायतीचे धामसे पंच विनोद गावकर यांनीही या संदर्भात विचारण केली असता त्यांना संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याचे गावकर यांनी सांगितले.
गुळेलीतील जनता तहानलेलीच मे महिना असल्याने गोव्यात सर्वत्र सध्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. परंतु गुळेली सारख्या भागात म्हादई नदी पाण्याने भरलेली असताना सुद्धा अधिकाऱयांच्या हलगर्जीपणामुळे या भागातील जनता तहानलेली आहे. एवढा मोठा प्रकल्प उभारूनही पाहिजे त्यावेळी जर लोकांना त्याचा उपयोग होत नाही तर फायदा काय असा सवालही उपस्थित होत आहे.