ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात टरबुजाची वाजत-गाजत अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध करण्यात आला.
अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रकरण चिघळल्याने प्रमुख पक्षांचे नेते आता जालन्यातील आंदोलनस्थळी भेट देत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालन्यातील सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं आहे. आज आंदोलनाच्या सातव्या दिवशी त्यांनी पाणीत्याग केलं आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज घटनेचा निषेध म्हणून मराठा बांधवांनी फुलंब्री येथे तिरडीवर टरबूज ठेवून अंत्ययात्रा काढत सरकारचा निषेध नोंदवला.