गोठ्यासाठी मिळतात 35 हजार, 22 बाय 12 फूट जागेत उभारावा गोठा, नागरिकांनी पुढाकार घेण्याची नितांत गरज
प्रतिनिधी / बेळगाव
उद्योग खात्री योजनेतून विविध कामांना चालना देण्यात येते. मात्र याची जनजागृती नसल्याने अनेकांना समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे ही योजना घरोघरी उपयोगी ठरू शकते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. उद्योग खात्री योजनेतून गोठा बांधण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये मिळू शकतात. मात्र याची जनजागृती झाली नसल्याने ही योजना धूळखात पडल्याचे दिसून येत आहे.
उद्योग खात्री योजनेंतर्गत जनावरांसाठी गोठा बांधण्याच्या दृष्टिकोनातून मदत करण्यात येत आहे. यासाठी 22 बाय 12 फूट जागेत हा गोठा बांधण्यात आला पाहिजे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना बारगळत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका पंचायतीच्यावतीने करण्यात आले. मात्र नागरिकांचे दुर्लक्षही तितकेच कारणीभूत ठरले आहेत. कोंबड्यांची खुराड बांधण्यासही उद्योग खात्रीतून मदत मिळते. मात्र याची जनजागृती करण्यात आली नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा आता सरकारकडून याबाबत जनजागृती करून या योजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
गोठा बांधण्यासाठी अनुसूचित जाती, जमातीसाठी 35 हजार ऊपये उद्योग खात्री अंतर्गत देण्यात येतात. तर सर्वसामान्यांसाठी 15 हजार 750 ऊपये मंजूर करण्यात येतात. काही ग्राम पंचायपतींमध्ये केवळ 35 हजार ऊपयांच्या निधीत कमी खर्चात चांगला गोठा तयार करण्यात आला आहे. तिन्ही बाजूने तीन फूट भिंती चढविण्यात आल्या असून खाली काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याबाबत समस्या असल्यास याची माहिती संबंधित ग्राम पंचायतींना देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.
गोठ्याबरोबरच शेळ्यांसाठी 10 बाय 8 फुटामध्ये बांधकाम करून गोठा उभारल्यास त्यांनाही निधी मंजूर करण्यात येतो. अनुसूचित जाती जमातीसाठी 35 तर सर्वसामान्यांसाठी 15 हजार 750 ऊपये मंजूर करण्यात येतात. कोंबड्यांसाठी 10 बाय 8 मध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी 40 हजार तर सर्वसामान्यांसाठी 17 हजार 100 ऊपये देण्यात येतात. मात्र तालुक्यात याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत लवकरच जनजागृतीसाठी संबंधित ग्राम विकास अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
सरकारकडून येणाऱ्या अनेक योजना या जनजागृतीअभावी बंद पडतात. याचबरोबर अनेक योजनांचा बोजवारा उडतो. अशीच अवस्था उद्योग खात्री योजनेतूनही झाली आहे. गोठा, शेळीपालनसाठी बांधण्यात येणारे शेड व इतर तत्सम गोष्टींकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे आज अशा छोटेखानी उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तेव्हा याबाबत आता गांभीर्याने लक्ष देवून जर जनजागृती केली तर अनेक गरिबांना या योजनांचा लाभ होवू शकतो, असेही बोलले जात आहे.