ऑनलाईन, प्रतिनिधी
Ajit Pawar News : सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल इंडिक टेल्सच्या वेबसाईटवर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. याबाबात आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र सदनातील पुतळे हलवण्यावरून अजित पवार यांनी टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भावना दुखवायच्या नव्हत्या तर पुतळे हटवले कशाला? पुतळे हलवताना ज्या अधिकाऱ्यांने लक्ष दिले नाही त्यावर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मध्यरात्रीत पूजा तसेच मिरवणूक काढून अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली.तसेच कार्यक्रम घेतले यावरून सत्ताधाऱ्यांनी टीका केलीय. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की,चौंडीत रोहित पवारांकडून स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केला होता. कुठल कार्यक्रम घेतला ते मला माहित नाही, अस वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना अपेक्षित मदत,मिळाली नाही याबाबत बोलतान अजित पवार म्हणाले की, अवकाळी पावसामुळे बरंत नुकसान झालं आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जाहीर झालेलं शेतकऱ्याला मिळत नाही. यंदा पावसाळा सुरु होण्यापूर्वी सरकारनं तयारी करावी असा सल्लाही पवारांनी शिंदं-फडणवीस सरकारला दिला.
महिला कुस्तीपटूंनी काल मेडल गंगेत विसर्जित करण्य़ाचा निर्णय घेतला यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी सरकारला सवाल केला. ते म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून कुस्तीपटू महिला आंदोलन करत आहेत. आपल्याकडे महिलांचा सन्मान केला जातो. एक संस्कृती आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घ्या. त्या जे सांगत आहेत त्यात तथ्थ असेल तर निर्णय घ्या. तथ्थ नसेल तर त्यांना समजून सांगा.
लोकसभा निवडणूकी संदर्भात राष्ट्रवादीची बैठक पार पडली याची माहिती देताना अजितदाद म्हणाले,निवडणूकीला अजून एक वर्ष आहे. लोकसभेसाठी आढावा घेतोय हे खरं आहे पण, अंतिम निर्णय जागावाटप झाल्यावरच होणार असल्याचे ते म्हणाले.