सुखोई-मिराजची हवेतच जोरदार टक्कर : मध्यप्रदेशातील मुरैनामध्ये लढाऊ विमानांना अपघात
धडकेनंतर सुखोई 90 किमी अंतरावर भरतपूरमध्ये कोसळले ः दोघांचेही ग्वाल्हेरहून उड्डाण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील मुरैना येथे हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराजö2000 यांचा शनिवारी भीषण अपघात झाला. सुखोई विमानाचे दोन्ही पायलट सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले असले तरी ‘मिराज’मधील पायलटचा करुण अंत झाल्याचे भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱयांनी सांगितले. वीरमरण प्राप्त झालेला वैमानिक बेळगाव-गणेशपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले असून या अपघाताच्या वृत्ताने बेळगाववर शोककळा पसरली आहे. या अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत.
हवाई दलाची दोन शक्तिशाली लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज-2000 शनिवारी एकमेकांना धडकली. दोन्ही विमानांनी सरावासाठी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. अपघाताचे कारण अद्याप समजले नसून तपासानंतरच कळेल. अपघाताच्या वेळी सुखोई-30 मध्ये दोन पायलट आणि मिराज-2000 मध्ये एक पायलट होता. या दुर्घटनेवेळी दोन्ही विमानांचा वेग इतका जास्त होता की, टक्कर झाल्यानंतर दोघांचे अवशेष वेगवेगळय़ा ठिकाणी कोसळले. ‘मिराज’चे अवशेष मध्यप्रदेशातील मुरैना येथे कोसळले असले तरी ‘सुखोई’ तब्बल 90 किमी अंतरावर राजस्थानमधील भरतपूर येथे कोसळले.
ही दुर्घटना भारतीय हवाई दलासाठी मोठी हानी मानली जात आहे. सुखोई आणि मिराज या विमानांनी नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण केले. प्रशिक्षणादरम्यान दोघेही अगदी जवळून उड्डाण करत असताना दोन्ही विमाने एकमेकांना धडकली. शनिवारी सकाळी 10.00 ते 10.30 च्या दरम्यान हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-30 आणि मिराज-2000 कोसळली. टक्कर झाल्यानंतर मिराजला आग लागून ते मध्यप्रदेशातील मुरैना येथील पहाडगडमध्ये पडले. यात पायलट मरण पावला. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी अडीच तासांहून अधिक वेळ लागला.
टक्कर झाल्यानंतर सुखोईला आग न लागल्याने ते प्रचंड वेगाने पुढे गेले. तथापि, त्याचे पंख तुटले. सुखोईच्या दोन्ही पायलटना विमान कोसळणार असल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी स्वतःहून बाहेर झेप घेत स्वतःला वाचविले. पॅराशूटच्या सहाय्याने दोघेही जमिनीवर पडले. यानंतर, पायलटशिवाय सुखोई राजस्थानच्या भरतपूर जिह्यातील पिंगोरा येथे पूर्वीच्या घटनास्थळापासून 90 किमी अंतरावर पडले.
अपघाताबाबत गोंधळाची स्थिती
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या अपघाताचे वृत्त सर्वप्रथम समजले. त्यानंतर भरतपूरमध्ये एक लढाऊ विमान कोसळल्याचे सांगण्यात आले. मात्र भरतपूरच्या जिल्हाधिकाऱयांनी चार्टर्ड विमान भरतपूरजवळ कोसळल्याचे सांगितले. काही वेळाने मुरैना येथूनही लढाऊ विमान कोसळल्याची बातमी मिळाली. तोपर्यंत या दोन्ही घटना वेगळय़ा असल्याचे मानले जात होते. त्यानंतर 15 मिनिटांनी मुरैनामध्ये दोन लढाऊ विमानांची टक्कर झाल्याचे सांगण्यात आले. 11.30 ते 12.30 पर्यंत नेमके काय आहे हे समजू शकले नव्हते. अखेरीस दुपारी दोनच्या सुमारास सुखोई आणि मिराज विमानांचा अपघात झाल्याचे ट्विट करून हवाई दलाने काही प्रमाणात परिस्थिती स्पष्ट केली.
चौकशीचे आदेश
अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने शनिवारी सकाळी ग्वाल्हेरजवळ कोसळली. हे विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होते. यात सहभागी असलेल्या तीन वैमानिकांपैकी एकाचा मृत्यू झाला, असे हवाई दलाने सांगितले. साधारणपणे, दोन विमाने हवेत टक्कर होण्याचे कारण मानवी चूक असू शकते, असेही संकेत देण्यात आले. अपघाताचे कारण सांगणे घाईचे होईल. मात्र, जेव्हा दोन विमाने एका विशिष्ट भागात आदळतात तेव्हा मानवी चुकांची शक्मता जास्त असते, असे हवाई दलाचे निवृत्त पीआरओ अनुपम बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. वैमानिकाच्या निर्णयामुळे किंवा एअर कंट्रोलमधील समस्येमुळे अशी घटना घडण्याची शक्मयता आहे.
अपघातग्रस्त लढाऊ विमाने….
मिराज-2000 ः हे भारतीय हवाई दलातील सर्वोत्तम आणि प्राणघातक लढाऊ विमानांपैकी एक आहे. मिराज-2000 ही प्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवली आहे. त्याने 1978 मध्ये पहिले उड्डाण केले आणि 1984 मध्ये प्रेंच हवाई दलात सामील झाले. 1985 मध्ये मिराजला पहिल्यांदा भारतीय हवाई दलात सामील करण्यात आले. भारतीय वायुसेनेने याला ‘वज्र’ असे नाव दिले आहे. मिराज 2000 हे लेझर गाईडेड बॉम्ब, हवेतून हवेत आणि हवेतून पृ÷भागावर मारा करणाऱया क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. कारगिल युद्ध, सर्जिकल स्ट्राईकमध्ये मिराज 2000 विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 38 वर्षात आतापर्यंत मिराज-2000 च्या 13 दुर्घटना घडल्या आहेत.
सुखोई-30 ः सुखोई-30 हे भारतातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे. भारतीय हवाई दलासाठी हे विमान नोव्हेंबर 1996 मध्ये खरेदी करण्यात आले होते. या विमानात ब्रह्मोस या जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे. या विमानात दोन टर्बोजेट इंजिन असून ते ताशी 2,120 किलोमीटर वेगाने उडू शकतात. तर, रेंज 3,000 किमी पर्यंत आहे. एवढेच नाही तर हवेतच इंधन भरल्यानंतर ते 8,000 किमीपर्यंतचे अंतर कापू शकते. या विमानाची एकूण रुंदी 14.7 मीटर, 21.9 मीटर लांब आणि 6.4 मीटर उंच आहे. सुखोई 30 हे जगातील सर्वात जड सशस्त्र लढाऊ विमानांपैकी एक आहे. हे विमान भारतीय हवाई दलाचा कणा मानले जाते.