कोल्हापूर प्रतिनिधी
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायती समितीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडविण्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी केले. प्रत्येक गल्लीत पक्षाची शाखा आणि बुथ तयार करा. नागरिकांच्या समस्या मार्गी लावा. पक्षाचे ध्येय धोरणे, आतापर्यंत केलेली कामे तळगळापर्यंत पोहोचवा, अशाही सूचना त्यांनी केली. वंचित बहुजन युवा आघाडी करवीरच्यावतीने बुधवारी शाहू स्मारक भवन येथे युवा मेळाव्या घेतला. यावेळी ते बोलत होते.
प्रा. साळुंखे म्हणाले, देशाची वाटचाल हुकमशाहीकडे सुरू आहे. हे चित्र वेगवेगळ्या प्रसंगातून पाहण्यास मिळत आहे. दिल्लीत पैलवानावर अन्याय झाला म्हणून आंदोलन सुरू केले. संबंधितांवर कारवाई करण्याचे सोडून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. हे लोकशाहीला घातक आहे. एकूणच देशात हुकमशाही प्रस्तावित करण्याचे काम सद्याचे केंद्र सरकार करत आहे. सर्वसामान्यांवर अन्याय सुरू आहे. त्यामुळे वंचित बहुजनचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्वसामान्य, बारा बलुतेदार, ओबीसीमधील वंचितांना सत्तेत संधी मिळण्याचे सोशल इंजिनिअरींगला महत्व प्राप्त झाले आहे.
लोकसभेच्या गत निवडणूकीमध्ये वंचित बहुजनच्या उमेदवारांना 81 लाख तर विधानसभेमध्ये 25 लाख मते पडली. ही मते प्रस्तापितांना तडा देणारी ठरली आहेत. यापैकी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 13 मते मिळाली आहेत. मते मिळाली परंतू सत्तेपर्यंत जाता आले नाही. आणखीन थोडा प्रयत्न केला तर वंचितला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित’चा प्रतिनिधी गेला पाहिजा, अशी प्रतिज्ञा घ्यावी. यासाठी आतापासून कामाला लागा. सर्वांनी हेवेदावे, स्पर्धा बाजूला ठेवा, असे आवाहन प्रा. साळुंखे यांनी केले.
वंचितचे अॅड अफ्रोज मुल्ला म्हणाले, जगात आतापर्यंत जी क्रांती झाली आहे. त्यामध्ये युवकांचे मौलाचे योगदान आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्वसामान्यांना सत्तेत स्थान देण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यास युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक गल्लीत वंचित युवक आघाडी स्थापन करा. हक्क आणि स्वप्नांच्या आडवे येणाऱ्यांना ताकद दाखवा. आगामी निवडणूकीसाठी सुक्ष्म नियोजन करा, जिल्ह्यात वंचितची वोट बँक आहे. त्यांना बुथपर्यंत आणा. अखेर वंचितचा विजय होईल. यावेळी वंचितचे भिमराव कांबळे, कामगार सेलचे संजय गुदगे, जिल्हाध्यक्ष मिलींद सनदी,
धर्मनिरपेक्षतेला तडा देण्याचे काम
केंद्रातील सरकार भांडवलदारांच्या बाजूने झुकलेले सरकार असून समाजवाद नष्ट करत आहे. धर्मनिरपेक्षतेला सरकार तडा देण्याचे काम करत आहे. संविधानावर हल्ला करून त्यांचा विचाराचे सरकार आणायचे असल्याचा आरोपही प्रा. साळुंखे यांनी केला.