सावंतवाडी प्रतिनिधी
मोती तलावातील गाळ काढण्यास आज पासून अखेर सुरुवात करण्यात आली आहे. गाळ काढण्यासाठी रॅम्प तयार करण्यात आला असून आज हा रॅम्प मातीचा भराव टाकून रस्ता करण्यात आला. त्यानंतर आज दुपारी १२. ३० वाजता मुख्याधिकारी सागर साळुंखे , माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे , आबा केसरकर, , सुदेश कोरगावकर आदींच्या उपस्थितीत पोकलेन द्वारे तलावातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या आठ दिवस तलावात डंपर व जेसीबी जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी वेळ गेला. अखेर गाळ काढण्यास आज सुरुवात करण्यात आली आहे. सावंतवाडीकर नागरिकांनी गाळ काढण्याच्या मोहिमेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. पावसाच्या तोंडावर गाळ काढण्याची मोहीम कशी काय राबवली जाते असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. मात्र गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आल्याने एक पोखरण मशीन व तीन ते चार डंपर आजपासून गाळ उपसा साठी वापरले जाणार आहेत. असे श्री साळुंखे यांनी स्पष्ट केले. पाऊस पडण्या अगोदर काढण्यात येणार आहे.