सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयात कविसंमेलन
पेडणे : आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्या अनुभवांना मुरू द्यावे लागते, त्यानंतरच लिहावे, असा सल्ला गोमंतकीय कवयित्री चित्रा प्रकाश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना दिला. विर्नोडा -पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी प्रमुख पाहुण्याज्येष्ठ गोमंतकीय कवयित्री चित्रा प्रकाश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत व डॉ. नीता तोरणे अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सौ. क्षीरसागर यांनी आपले अनुभव विद्यार्थांना कथन केले. काही गोष्टी मनावर कोरल्या जातात. त्या मनातल्या मनात मुरत राहतात, त्यानंतरच उत्तम कविता येते, असेही त्या म्हणाल्या. भगवान परब याने सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय पूनम राऊळ हिने करून दिला. ईशस्तवन भिसे गवस, सेजल नाईक, भार्गवी फडके, मयुरी पेडणेकर यांनी सादर केले. गोमंतकीय कवी- गझलकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्यासह सेजल नाईक, तृप्ती सुतार, चित्रा सांब्र्रेकर, सेजल गावडे, मयुरी पेडणेकर, भार्गवी फडके, स्वऊपा नाईक, गौरेश वेंगुर्लेकर, महिमा दलाल, साहिल नाऊलकर, इशरा खान, यशवंत गावस आदी कवि- कवयित्री?नी विविध विषयांवरील कविता सादर केल्या