म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराज देश वाचवण्यासाठी आपल्या सर्व धर्मीय लोकांना बरोबर घेऊन लढले. आया बहिणींचे अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले प्राणप्रणापणाला लावले व जुलमी राजवटीपासून रयतेचे संरक्षण केले, असे प्रतिपादन साहित्यिक प्रकाश धुमाळ यांनी केले. एकता नगर हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथे आयोजित केलेल्या छत्रपती यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावर्षी पहिलाच शिवजयंती कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा केला. प्रारंभी येथील युवकांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, शिवरायांमुळे आम्ही शूर होण्याची प्रेरणा मिळते. शिवरायांसारखे आम्ही पराक्रमी होण्याची इच्छा आहे, असा मानस युवकांनी यावेळी व्यक्त केला.
Previous Articleअनुभव मुरल्यानंतरच लिहावे – चित्रा क्षीरसागर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.