Youth poet Mandar Sambari’s success in written poetry competition
साहित्य, कला,व्यक्तित्व विकास मंच (“साकव्य”) नाशिक यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या स्वरचित काव्य स्पर्धेत आचरा गावचे सुपुत्र मंदार सांबारी यांना यश प्राप्त झाले असून त्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. संपूर्ण भारतभर पसरलेला साहित्यिकांचा हा काव्यमंच असून या मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनेक कवी-कवयित्री या सहभागी झाले होते.स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला. कवी श्री.मंदार श्रीकांत सांबारी यांनी “द्वितीय ” क्रमांक प्राप्त केला. यासाठी त्यांना “आनंद ” हा विषय देण्यात आला होता .त्यांनी “आनंद ” विषयावरील अभंग सादर करत यश प्राप्त केले आहे. मोठ्या स्तरावरील स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
आचरा प्रतिनिधी