प्रतिनिधी / सातारा
राजवाडा परिसरात अजिंक्य गणेश मंदिराच्यासमोर कसेही हातगाडे लागलेले आहेत. मंदिराचे पावित्र्य राखले जात नाही. त्यामुळे ते हातगाडे काढण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी दिला आहे. राजवाडा परिसरात अतिक्रमाणांची बजबजपुरी वाढू लागली आहे. हॉकर्स धारकांसाठी कोटय़ावधी रुपयांचा खर्च करुन युनियन भाजी मंडई उभी करण्यात आली आहे. मात्र, तेथे कटय़ावर फळे विक्री करण्याऐवजी कुठेही हातगाडे लागलेले दिसतात. अजिंक्य गणेश मंदिराच्या समोर कसेही हातगाडे लागलेले असून त्यांच्याकडून पावित्र्य राखले जात नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्या यावी, अन्यथा पालिकेच्यासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कायंकर्ते संतोष शेंडे यांनी दिला आहे.