विनायक बागडे / श्रीपूर
आशिया खंडात सर्वात मोठ्या असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटाने विरोधकांशी चुरशीची लढत करत मोठा विजय मिळवला आहे. एकूण १७ जागांपैकी १४ विजय मिळवत, एक हाती सत्ता आणली आहे. मात्र, पुतण्याच्या पराभवामुळे मोहिते – पाटील गटाची अवस्था गड आला पण सिंह गेला, अशी झाली आहे.
अकलूज ग्रामपंचायतीकडे संपुर्ण महाराष्ट्रात राज्या चे लक्ष लागले होते, निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात विरोधी डॉ. धवलसिंह पाटील यांनी आवाहन उभे केले होते. निवडणुकीत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी उर्वशीराजे मोहिते या बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर आज वार्ड क्रमांक तीन मधून ज्योती कुंभार आणि गिरीराज माने देशमुख यांनी विजय मिळवला आहे. येथे जयसिंह मोहिते पाटील याचे पुत्र संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक परावभव केला आहे. संग्रामसिंह यांचा पराभव मोहिते पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. पुन्हा एकदा अकलूजकरांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचेकडे एक हाती सत्ता दिली असली तरी गड आला पण सिंह गेला अशीच काहीसी स्थिती विजयसिंह मोहिते पाटील गटाची झाली आहे.