प्रतिनिधी/ सातारा
टोकिओ ऑलंम्पिक सामन्याची सुरूवात नुकतीच झाली, यंदाच्या या स्पर्धेचे वैशिष्ठ म्हणचे सातारा जिल्हातील प्रविण जाधव या खेळाडुची ही आर्चरी (तिरंदाजी) या खेळाकरीता निवड झाली होती. तिरंदाजी खेळामध्ये ऑलंम्पिक सामन्यात सहभागी होणारा प्रविण हा जिल्हय़ातील आजपर्यंतचा पहिलाच खेळाडू होता. त्याला या स्पर्धेत यश जरी मिळविता आले नसले तरी त्याने आपल्या पतिस्पर्धींना चांगली टक्कर दिली. पण त्याने घेतलेल्या या अथक परिश्रमाची राज्य सरकारने अद्याप कोणतीच दखल घेतली नाही.
पण प्रविण सोबत या खेळात सहभागी झालेल्या अतानू दास या स्पर्धकाला त्याच्या राज्यसरकारने पाच कोटी व घर भेट स्परूपात जाहीर केले आहे. आतानूलाही या स्पर्धेत यश जरी मिळविता आले नसले तरी त्याने प्रतिस्पर्धकांना तगडे वाव्हान दिल्याने त्याने घेतलेल्या परिश्रमासाठी त्याला हे बक्षिस जाहीर केले. पण सातारच्या प्रविणच्या पदरी अद्याप निराशाच आली आहे.
प्रविण जाधवने ही या स्पर्धेत (पुरूष-वैयक्तीक गट)एलेमिनेशन गटात 32 जणांच्या फेरीत जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित असलेल्या रशियाच्या गॅल्सन बॅझरपोव्ह याचा पराभव केला. याचा 6-0 ने सनसनाटी पराभव करत बाद फेरीत धडक मारली होती. ऑलंम्पिकमध्ये पहिल्या तीन क्रमांकापैकी एखाद्या अव्वल तिरंदाजाला भारतीय तिरंदाजाने पराभवाचा धक्का देण्याची ही पहिलीच वेळ होते. त्याचबरोबर त्याने सांघिक स्पर्धेत ही इतर खेळाडुंपेक्षा चांगली चमक दाखविली होती. तसेच तो इतर खेळाडुंपेक्षा वयाने ही सर्वात लहान आहे.
शासनाच्या क्रिडा प्रबोदिनी मध्ये घडलेला खेळाडु
प्रवीण हा मुळचा फलटण तालुक्यातील सरडे या गावचा रहिवासी त्याचे शालेय शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याची घरची परिस्थीती ही खुप हालाखीची होती, इयत्ता 6 वी मध्ये असताना शासनाच्या क्रिडा प्रबोदिनी मध्ये हा खेळाडु म्हणून नावा रूपास आला. घरच्या परिस्थितीमुळे त्याला नोकरीची गरज भासली आणि तो सैन्यात भरती झाला. त्याने आनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. तसेच त्याने जागतिक विद्यापीठाच्या, ऐशियन स्पर्धेत देखिल त्याने चमक दाखविले आहे.
सर्वेतोपरी मदत करणे गरजेचे
प्रविण जाधवने ऑलंम्पिक स्पर्धेत निवड झाल्याने संपुर्ण जिल्हय़ाचे नाहीतर देशाचे नाव उज्वल झाले आहे. त्याला या स्पर्धेत यश जरी मिळविला आले नसले तरी त्याने स्पतीस्पर्धींना चांगली टक्कर दिली. आगामी काळात येणाऱया पुढील स्पर्धेत तो नक्कीच प्राविण्य मिळवु शकतो. आता शासनाने आणि विविध संघटनेने त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्याला आंतराष्ट्रीय दर्जाचा सराव कराता यावा याकरीता सर्वतोपरी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
कन्हैयालाल राजपुरोहित