गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या पोलीस दलातील वरिष्ठांचा प्रयत्नाने खळबळ : वरिष्ठांना आरसा दाखविल्याच्या प्रकाराची पोलीस दलात चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. जनावरे चोरण्याच्या प्रकाराने शेतकरी हैराण झाले आहेत. गुन्हेगारी टोळय़ांच्या मुसक्मया आवळून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी असणारे पोलीस अधिकारीच गुन्हेगारी टोळय़ांशी हातमिळवणी करून त्यांना पाठीशी घालत आहेत. गुन्हेगारांना पकडणे हे अतिशय मेहनतीचे आणि चातुर्याचे काम आहे. मात्र, जीवतोड मेहनत घेऊन गुन्हेगारांना गजाआड करणे हाच गुन्हा ठरू पाहत आहे. जनावरे चोरीच्या अशाच एका प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱया वरि÷ पोलीस अधिकाऱयाने तपास पथकातील अधिकारी व कॉन्स्टेबलना फैलावर घेण्याचा प्रकार घडला आहे.
आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले असून उपायुक्तांनी दोघांनाही बोलावून त्यांच्याकडून घडल्या प्रकाराबद्दल माहिती घेतली आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱया एसीपीला पोलिसांनी चांगलेच धारेवर धरून त्याच्या अंगावर धावून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी 23 मार्च रोजी सुरेश परशराम पाटील (वय 32), गणेश काशप्पा नाईक (वय 24) या दोघा जणांसह जनावरे चोरणाऱया चार जणांच्या एका टोळीला गजाआड केले होते. या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. बेळगाव ग्रामीण आणि काकती पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात त्यांनी पाच ठिकाणी जनावरे चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर, उपनिरीक्षक आनंद आदगोंडा, वाय. एम. तळेवाड, एम. एस. गाडवी, सी. एम. हुनश्याळ, एन. एम. चिप्पलकट्टी, जी. वाय. पुजार आदींचा समावेश असलेल्या पथकातील अधिकाऱयांनी पाच गायी व पाच म्हशी अशी दहा जनावरे या टोळीकडून जप्त केली. या टोळीने पाच ठिकाणी जनावरे चोरल्याची कबुली दिली आहे. जनावरे व जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन जप्त करून सुरेश व गणेश यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले.
पोलीस अधिकाऱयांवरच दादागिरीचा प्रयत्न
एखाद्या प्रकरणात वैद्यकीय तपासणी करून गुन्हेगारांना न्यायालयासमोर हजर केले जाते. न्यायालयाच्या आदेशावरून आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली जाते. त्यानंतर पोलिसांची कागदपत्रांची कार्यवाही सुरू होते. या प्रकरणात संशयितांना कारागृहात धाडल्यानंतर या गुन्हेगारांचा पाठीराखा असलेल्या ‘गणपत’ नामक वरिष्ट पोलीस अधिकाऱयाने या प्रकरणी तपास केलेल्या अधिकाऱयांनाच भीड घालून त्यांच्यावर दादागिरीचा प्रयत्न केला. ‘जनावरे चोरणाऱया टोळीला का अटक केली? त्याची माहिती आपल्याला का दिली गेली नाही?’ असे प्रश्न विचारत तपास अधिकाऱयांना गुन्हेगारांच्यावतीने रदबदली केली.
सुरुवातीला बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात वादावादीचा प्रसंग घडला. त्यानंतर 24 मार्च रोजी चौकशीच्या निमित्ताने ‘गणपत’ने तपास पथकातील चार पोलिसांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. यावेळी तपास यशस्वी केलेल्या पोलिसांना वाटले की, साहेबांनी शाबासकीची पाठ थोपटण्यासाठीच आपल्याला बोलावणे धाडले आहे. मात्र, साहेबांच्या कार्यालयात पोहोचल्यावर या तपास अधिकाऱयांनाच ‘जनावरे चोरणाऱयांना तुम्ही का अटक केली?’ असा उलटा सवाल करत धारेवर धरून दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ न देता त्यांच्यावरच उलटविला.
प्रामाणिक पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत वरि÷ अधिकारी ‘गणपत’च्या या ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ आणि चोरांनाच संरक्षण देण्याच्या प्रकाराने या प्रामाणिक पोलिसांच्या सहनशीलतेचा अंत झाला. ‘तुम्ही या चोरटय़ांना का वाचविण्याचा प्रयत्न करताय, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. आम्ही जर तोंड उघडले तर तुमचीच काही खैर नाही’ असा सरळ दम या वरि÷ अधिकाऱयाला तपास पथकातील पोलिसांनी भरला. सामान्य पोलिसांनी आपल्या वरि÷ांना आरसा दाखविल्याच्या या प्रकाराची पोलीस दलात जोरदार चर्चा रंगली आहे. यासंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार आपल्या कानावर आल्याचे त्यांनी सांगितले.