मंत्री शशिकला जोल्ले यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ अकोळ
भारतीय संस्कृतीची परंपरा मोलाचे असून त्याची जोपासना सर्वांनी केली पाहिजे. अनाथ बालकांचे पालक बनण्याचे भाग्य कमी लोकांच्या नशिबात असते. याचा विचार करुन आपले जीवन सार्थकी लावावे. वाढदिवस साजरा करताना केकवरील दीप विझवू नका, तो तसाच प्रज्वलीत राहिल याकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी पेले.
त्या ममदापूर केएल येथील अंबिका देवालयाच्या प्रांगणात आयोजित 52 व्या वाढदिवस सोहळय़ात बोलत होत्या. मंत्री जोल्ले पुढे म्हणाल्या, सध्या विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला जाणार नाही. कार्यकर्त्त्यांच्या भावना लक्षात घेऊन या दिवशी अनाथ मुलाच्या नामकरण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात आपणास सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे, ते माझे भाग्य आहे. गत दोन महिन्यांपासून सदर अनाथ बालकाचे संगोपन करणारे अमर पवार व शुभांगी पवार यांचे कौतुक आहे. सदर मुलाच्या भवितव्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मंत्री, आमदार शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत अंबिका देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी अनाथ बालिकेचा शाही नामकरण सोहळा पार पडला. सदर बालिकेचे नामकरण वैष्णवी असे करण्यात आले. याप्रसंगी दादाराजे देसाई सरकार, सरोजनी जमदाडे, संध्या आचारी, लोंढा आदींनी मनोगत व्यक्त केले. समारंभात बाळासाहेब कदम, तोसीफ नदाफ यांनी तयार केलेल्या शब्द सुमनांची सूमनांजलीची प्रतिमा जोल्ले यांना प्रदान करण्यात आली. तसेच पोवार दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी निपाणी पालिका उपनगराध्यक्षा नीता बागडे, ममदापूर ग्रा. पं. च्या उपाध्यक्षा सरिता पाटील, सदस्य संजय आवटे, ग्रामीण अध्यक्ष प्रवण पाटील, बाबासाहेब गोरवाडे, प्रसाद शिंदे, शिवाजी आवटे, प्रकाश पाटील, श्रीरंग कदम, दादा पाटील, विश्रांती माने, माहेश्वरी चौगुले, बाळासाहेब बेलेकर, रूपाली पाटील, उज्वला शिंदे, हालसिद्धनाथच्या संचालिका मनिषा रांगोळे, सुहास गुगे, संजय पिसाळ, दीपक जाधव, नामदेव मधाळे, रमेश मेस्त्री यांच्यासह कार्यकर्त्ते उपस्थित होते. ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब कदम यांनी आभार मानले.