मंगळवारी परतले 78 नागरीक, प्रतिदिन 2 विमानांच्या फेऱया
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील भारताच्या नागरीकांना भारतात आणण्याच्या कामाला वेग आला असून आतापर्यंत 800 हून अधिक लोकांची सुटका करण्यग्नात आली आहे. या अभियानाला आता ‘देवी शक्ती अभियान’ असे नाव देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रतिदिन विमानांच्या दोन ते तीन फेऱया केल्या जाणार आहेत. आतापर्यंतची कार्यवाही सुरळीत झाली असल्याची माहिती देण्यात आली.
सोमवारी अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथ साहेब या शीखांच्या पवित्र ग्रंथाच्या तीन ऐतिहासिक प्रती भारतात आणण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या प्रती आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी सोमवारी या प्रतींचे स्वागत केले. अफगाणिस्तानात अजूनपर्यंत अडकलेल्या भारतीय नागरीकांच्या संपर्कात भारत सरकार सातत्याने असून सर्वांची सुटका करण्यग्नाचा प्रयत्न करण्यग्नात येणार आहे. पंतप्रधान मोदी आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने नागरीकांची सुटका करण्यात घेतलेल्या पुढाकारासंबंधात पुरी यांनी त्यांचे आभार मानले. भारत सरकार आपले कर्तव्य चोख पार पाडत आहे. नागरीकांनीही पूर्णतः सरकारशी सहकार्य केले आहे, अशी माहिती पुरी यांनी दिली.
काबूल विमानतळावर गर्दी
अफगाणिस्तानातून सुटका करुन घेण्यासाठी असंख्य नागरीक प्रतिदिन काबूल विमानतळावर गर्दी करत आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली अशा अनेक देशांच्या नागरीकांचा समावेश आहे. त्यामुळे काबूल विमानतळाला जत्रेचे स्वरुप आले आहे. भारत आपले सुटका अभियान अमेरिका आणि इतर देशांच्या सहकार्याने पार पाडत आहे. आतापर्यंत सर्व देशांचे मिळून जवळपास 8 हजार नागरीक अफगाणिस्तानातून बाहेर पडले आहेत.
पंतप्रधान मोदींची पुतीनशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यग्नांच्याशी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा केली आहे. ही चर्चा साधारणतः 45 मिनिटे चालली. दोन्ही नेत्यांनी त्या देशातील परिस्थिती आणि नव्या घडामोडी यग्नांच्यासंबंधात सविस्तर बोलणी केली. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संदर्भात भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्यावरही बोलणी करण्यात आली, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संदेशात दिली आहे. त्यांनी जर्मनीच्या प्रमुख अँजेला मर्केल यांच्याशीही या विषयावर चर्चा केली आहे. विदेश व्यवहार मंत्री एस. जयंशकर यांनीही या चर्चेची माहिती दिली. अफगाणिस्तानसंबंधी भारताची भूमिका आपल्या मित्र राष्ट्रांशी चर्चा करुन ठरविणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तालिबानची सरकार स्थापनेची तयारी
तालिबानला अफगाणिस्तानचा ताबा घेऊन आता एक आठवडा लोटला आहे. काबूलमध्ये सत्ता स्थापनेची तयारी त्याने सुरु केली आहे. या सरकारमध्ये माजी अध्यक्ष हमीद करझाई यांचा किंवा त्यांच्या प्रतिनिधीचा समावेश असू शकतो, अशी चर्चा आहे. या सरकारमध्ये तालिबानच्यग्ना सर्व गटांना प्रतिनिधित्व देण्यग्नाच्या संबंधात चर्चा सुरु आहे. मात्र, तालिबान जे बोलत आहे, त्यापेक्षा त्यग्नाच्याकडून जी कृती करण्यात येईल, त्यावर त्याची पारख केली जाईल, असे सूचक विधान ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी केले असून ते महत्वाचे मानण्यात येत आहे.
300 तालिबानी ठार ? एकीकडे अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळविल्याचा दावा तालिबान करत असतानाच, या देशाच्या उत्तर भागात तालिबानला विरोध वाढत आहे. नॉदर्न अलायन्सशी तालिबानचा संघर्ष सुरु असून तालिबानचे 300 हून अधिक हस्तक मारले गेल्याचा दावा करण्यग्नात येत आहे. तालिबानने पंजशीर खोरे ताब्ग्नयात घेण्यासाठी आपले सशस्त्र हस्तक पाठविले आहेत. त्यामुळे तेथे आणखी संघर्ष भडकण्यग्नाची शक्यता आहे. पंजशीरचे नेते अहमद मसूद यांनी तालिबानशी बोलण्याची तयारी दर्शविली आहे, मात्र सैनिकही तयार असल्याचे स्पष्ट केले.