सेन्सेक्स 2000 अंकांनी घसरला, गुंतवणूकदार चिंतेत
वृत्तसंस्था / मुंबई
मागील आठवडय़ातील तेजीचा प्रवास कायम राखण्यात मुंबई शेअर बाजाराला चालू आठवडय़ात पहिल्याच दिवशी अपयश आल्याचे दिसून आले आहे. याला अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढलेल्या तणावाची आंतरराष्ट्रीय घडामोड कारण ठरली आहे. याचा प्रभाव देशातील शेअर बाजारांवर झाला आहे. काळजीपोटी गुंतवणूकदारांनी आपले समभाग विकल्याने सेन्सेक्स दिवसअखेर 2,002.27 अंकांनी घसरुन निर्देशांक 31,715.35 वर बंद झाला. दुसऱया बाजुला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 566.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 9,293.50 वर बंद झाला. पहिल्याच दिवशी बाजाराला घसरणीचा अनुभव झेलावा लागला.
दिग्गज कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेचे समभाग सर्वाधिक म्हणजे 10 टक्क्मयांनी घसरले आहेत तर सोबत बजाज फायनान्स, एचडीएफसी, इंडसइंड बँक, ऍक्सिस बँक आणि मारुती सुझुकीचे समभागही घसरले आहेत. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागही दोन टक्क्मयांनी खाली आले आहेत. कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा अहवाल सादर करण्यात आला असून यात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नफ्यात नोंदवली आहे. जानेवारी ते मार्च 2020 या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 37 टक्क्मयांनी घटून 6,546 कोटींच्या घरात पोहोचला आहे. याच दरम्यान तंत्रज्ञान बाजारातील कंपनी सिल्वर लेकने जिओ प्लॅटफार्ममध्ये 5,655.75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. बीएसईच्या व्यवहारात दिवसभरात मात्र भारती एअरटेल आणि सन फार्मा यांचे समभाग वधारले आहेत.
जगातील दोन महासत्ता असणाऱया अमेरिका आणि चीन यांच्यात मागील काही दिवसांपासून वादप्रतिवाद सुरु आहे. वुहानच्या प्रयोग शाळेतूनच कोरोना संसर्ग जगभरात आला असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यावरूनच चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारयुद्धाची पुन्हा आग भडकण्याची चिन्हे आहेत.
शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात असून याचे अप्रत्यक्ष पडसाद भारतीय शेअर बाजारावर पडले असल्याचेही यावेळी तज्ञांनी म्हटले आहे.
पीएमआय निर्देशांक 27.4 टक्क्मयांनी घसरला असून येत्या काळात याचा परिणाम बाजारावर राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घसरलेल्या बाजारामुळे गुंतवणूकदारांची पूर्ती निराशा झाली असून पुढील काही दिवसांवर आता ते लक्ष ठेवून असणार आहेत.