प्रतिनिधी/ सातारा
रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेटय़ा घेऊन जात असलेल्या टेंपोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने महामार्गावरून उपमार्गावर पलटी झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा आपघात झाला. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहनासह आंब्याच्या पेटय़ा रस्त्यावर विस्कटल्यामुळे आंब्याचा सडाच पडाला होता.
अपघातस्थळावरून व पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार टेंपो (क्रमांक एम एच 08 ए पी 2740 ) मधून दोघेजण रत्नागिरी येथून पुण्याकडे आंब्याच्या पेटय़ा घेऊन जात होते. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत आले असता टेंपोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेंपो महामार्गावरून उपमार्गावर पलटी झाला. या अपघातात चालकासह दोघेजण जखमी झाले आहेत. अपघातानंतर वाहनांसह आंब्याच्या पेटय़ा रस्त्यावरच विस्कटल्या होत्या. आंब्याच्या पेटय़ा तुटल्याने परिसरात आंब्याचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, मानसिंग सुर्यवंशी, योगेश पवार, अमित पवार, जितेंद्र भोसले तातडीने आपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी कराड शहर पोलिसठाण्यात खाबर देऊन मदत कार्य केले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. महामार्ग देभालचे व पोलीस कर्मचायांनी वाहन बाजूला घेऊन वाहतूक पूर्ववत केली.