आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. ती दूर करणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर येत्या दोन महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ आहे. तेव्हा आरोग्य विभागाने अधिक दक्ष व्हावे, अशी सूचना पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आरोग्य अधिकाऱयांना केली आहे.
कोरोना बाबतीतील आढावा घेण्यासाठी जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी पालकमंत्र्यांनी वरील सूचना केली आहे. कोरोनामुळे जिल्हय़ामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यापुढे अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. आजपर्यंत आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. यापुढेही अधिक दक्षतेने काम करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. तेव्हा लॉकडाऊनपेक्षा प्रत्येकाने स्वतःहूनच काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
ग्रामीण भागामधील जनता कोरोनाबाबत अधिक दक्ष आहे. कोणीही परराज्यातून आले किंवा इतर भागातून आले तर तातडीने ते याची माहिती देतात. याचबरोबर त्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्यास भाग पाडतात. मात्र, शहरामध्ये अजूनही याबाबत गांभीर्य घेतले जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ यांनी आजपर्यंत घेतलेल्या स्वॅबच्या नमुन्यांची माहिती दिली. जिल्हय़ातील आठ गर्भवती महिलांना कोरोना झाला होता. मात्र, त्यांची प्रसूती अत्यंत सुरळीतपणे पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.
खासगी हॉस्पिटल्समध्येही व्हेंटिलेटर्सची सोय
जिल्हय़ामध्ये एकूण 128 सारी रुग्ण आढळले आहेत. त्यांचा कोणाशीही संपर्क आला नसताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. 35 ते 65 वयोगटातील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बिम्समध्ये 27 व्हेंटिलेटर्स आहेत. याचबरोबर खासगी हॉस्पिटल्समध्येही व्हेंटिलेटर्सची सोय करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निगेटिव्ह असलेले रुग्ण घरी गेल्यानंतर पॉझिटिव्ह
महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी निगेटिव्ह असलेले रुग्ण घरी गेल्यानंतर पॉझिटिव्ह होत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने त्यांची अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. यावेळी आरोग्याधिकाऱयांनी संबंधित रुग्णाला कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती. त्यामुळे आम्ही त्याला घरी पाठविल्याचे सांगितले. एकाच रुग्णाच्या बाबतीत ही घटना घडली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार महांतेश कवटगीमठ यांनी महाराष्ट्रातून येणाऱया व महाराष्ट्रात जाणाऱया व्यक्तींबाबत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. अथणी, चिकोडी आणि हुक्केरी तालुक्मयातील अनेक जण दररोज महाराष्ट्रात जातात. तसेच ते काम करून कर्नाटकात येतात. त्यांच्याबाबत तुम्ही काय उपाययोजना केलात? असा प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी काही तरी नियमावली तयार करा, अन्यथा अथणी, रायबाग आणि चिकोडी तालुक्मयांमध्ये रुग्णांची संख्या वाढण्याची शक्मयता असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातून येणाऱयांसाठी आता होम क्वारंटाईन
महाराष्ट्रातून येणाऱया व्यक्तींची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाबत कोणतीही लक्षणे आढळली नाहीत तर त्यांना 14 दिवसांचे होम क्वारंटाईन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एफआयआर करणार म्हणजे नेमके काय करणार?
मास्क नसताना तसेच होम क्वारंटाईनमध्ये असताना रस्त्यावरून बिनधास्तपणे फिरत असल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करू, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. त्यावर आमदार व मंत्र्यांनी एफआयआर म्हणजे नेमकी कोणती कारवाई करणार? असे विचारले. त्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ब्युटीपार्लरबाबत तुमचा निर्णय काय?
महिला आणि बाल कल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी कुणाकुणाला पॅकेज आलेत त्याची माहिती अधिकाऱयांना विचारली. त्यावर नाभिक, धोबी, बांधकाम कामगार यांना पॅकेज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ब्युटी पार्लर चालविणाऱया महिलांना पॅकेज देणार की नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, इराण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र, पोलीस आयुक्त के. त्यागराज, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी उपस्थित होते.